Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माकेगावात शेतीच्या वादातून चुलत्यावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अंबाजोगाई : तालुक्यातील माकेगाव येथे शेतीच्या बांधावरील जुन्या वादातून गंभीर घटना घडली आहे. 16 एप्रिल रोजी सायंकाळी नवनाथ टेलर यांच्या दुकानासमोर

आता कर्जत-जामखेडमध्ये लक्ष घालून परिवर्तन करणार : माजी खा. विखे; चौंडी येथे ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे उत्साहात स्वागत 
शारदा कन्या विद्यामंदिरची यशस्वी परंपरा कायमदहावीच्या निकालात 91.56 टक्के यश; विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी
स्नेहल लवांडेचे दहावी परीक्षेत यश
बीडमध्ये क्रूरतेचा कहर; मासे आणण्यासाठी घरात पाय ठेवल्याचा सूड, अंबाजोगाईत  अविनाशच्या हत्येने खळबळ | क्राइम बातम्या - News18 Marathi

अंबाजोगाई : तालुक्यातील माकेगाव येथे शेतीच्या बांधावरील जुन्या वादातून गंभीर घटना घडली आहे. 16 एप्रिल रोजी सायंकाळी नवनाथ टेलर यांच्या दुकानासमोर कल्याण जीवनराव देशमुख यांच्यावर दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
फिर्यादी संजय उद्धवराव देशमुख यांच्या तक्रारीनुसार, नारायण बाबुराव देशमुख, अमर नारायण देशमुख आणि अयोध्या नारायण देशमुख यांनी संगनमत करून कल्याण देशमुख यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पकडून डोक्यात दगडाने वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या घटनेदरम्यान मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या फिर्यादीलाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 115(2) सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जगताप पुढील तपास करत आहेत.

COMMENTS