मुंबई : राज्यात पावसाचा जोर कायम असून, पुढील काही दिवस विविध भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ४ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रात म

मुंबई : राज्यात पावसाचा जोर कायम असून, पुढील काही दिवस विविध भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ४ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
हवामान विभागाने मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ या दिवसासाठी पावसाचा सुधारित इशारा जारी केला आहे. ज्यामध्ये उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा अंदाज पुढील पाच दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
४ ऑगस्ट रोजी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, साताऱ्यासह घाटमाथ्यावरील भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणासह दक्षिण कोकण आणि गोवा येथे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, आयएमडीने विदर्भातील पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज दिला आहे. मात्र अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बुलढाणा, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

COMMENTS