Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारला गॅस बंद करून स्टोव्ह चालू करायचे आहे का? – शेख युनूस

बीड : महाराष्ट्र सरकारकडून बीड जिल्ह्यासाठी 1.20 लाख लिटर रॉकेल मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा साठा जिल्ह्यातील 1977 स्वस्त धान्य

महिलांच्या विविध स्पर्धांना प्रतिसादजयभीम महोत्सव उत्सव समितीचे नियोजन
आष्टी येथील फार्मसी कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न; 9 विद्यार्थ्यांची निवड
शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा प्रयत्नशील-अ‍ॅड.मानकर

बीड : महाराष्ट्र सरकारकडून बीड जिल्ह्यासाठी 1.20 लाख लिटर रॉकेल मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा साठा जिल्ह्यातील 1977 स्वस्त धान्य दुकानांमार्फत नागरिकांना वितरित केला जाणार असून, प्रत्येक कुटुंबाला सुमारे तीन लिटर रॉकेल देण्यात येणार आहे.
मात्र, यापूर्वी बंद करण्यात आलेले रॉकेल पुन्हा सुरू करण्यामागे सरकारचा नेमका हेतू काय आहे, असा सवाल शेख युनूस यांनी उपस्थित केला आहे. गॅस युगात परत स्टोव्ह वापरण्याची वेळ आणायची आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. रॉकेल स्टोव्हमुळे पूर्वी अनेक अपघात झाले असून, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. तसेच काही महिलांनी आत्महत्येसाठी रॉकेलचा वापर केल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. त्यामुळे पुन्हा रॉकेल वितरण सुरू केल्याने अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, रॉकेलचा वापर पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ करण्यासाठी तर होणार नाही ना, अशी शंका देखील नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. सरकारने या निर्णयामागील स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.

COMMENTS