Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारवर अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे – संजय राऊत 

मुंबई प्रतिनिधी - मी काहीही चुकीचे वक्तव्य केलं असं मला वाटत नाही.  - मी सामान्य माणसाच्या मनातल्या कायद्यातल्या चौकटीतल्या व्यथा व्यक्त क

संजय राऊत तुमची बेसूर पिपाणी बंद करा.
 कानडी संघटनांना राज्यातून छुपा पाठिंबा, नेमका रोख कुणाकडे ? 
खा.संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई प्रतिनिधी – मी काहीही चुकीचे वक्तव्य केलं असं मला वाटत नाही. 

– मी सामान्य माणसाच्या मनातल्या कायद्यातल्या चौकटीतल्या व्यथा व्यक्त केल्या, सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, महाराष्ट्रातल्या सरकार संदर्भात ज्याला तुम्ही सत्तासंघर्ष म्हणतात, त्या संदर्भात त्याच्यामुळे स्पष्ट झाले आहे की, या सरकारवर अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे. या सरकारचा, या पक्षाचा ,या सरकारचा व्हीप बेकायदेशीर आहे. या पक्षाने नेमलेल्या घटना बेकायदेशीर आहे. यासंदर्भात राज्यपालांनी केलेली संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे.

–  16 आमदारांच्या अपात्र ते संदर्भातला निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे सगळं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं, त्याचा निर्णय अशा सरकारच्या डोक्यात डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे तर ते सरकार बेकायदेशीर आहे. 

– आणि आता अशा बेकायदेशीर सरकारचे आदेश कुणी पाळू नये,  ते आता बेकायदेशीर ठरतील आणि बेकायदेशीर आदेशाचे पालन केल्याबद्दल भविष्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना चौकशीला, कारवाईला सामोरे जावे लागेल. ही भूमिका मी मांडली याच्यामध्ये चिंता होण्याची भाषा तणाव निर्माण करण्याची भाषा ही आली कुठून? देशभरामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य नेहमी केले जातात. पण वक्तव्य संजय राऊत यांनी केलं म्हणून त्यांच्यावर खटला गुन्हा दाखल केला. अशा प्रकारे आदेश नाशिकच्या पोलिसांवर आले पण जरी गुन्हा दाखल झाला असला तरी मी त्या कारवाईला सामोरे जाईल. 

– त्यांचं काही करून माझ्यावर दबाव आणणं,  मला शरण येणे भाग पाडणे मग शिवसेना सोडायला लावून उद्धव ठाकरे यांना सोडायला लावून अशा  प्रकारची दबाव निती आहे. पण मी बळी पडणार नाही. 

– विधानसभा अध्यक्ष यांना आज शिवसेना भेटणार आहे. 

– ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय ताशेरे मारून हे कसं बेकायदेशीर आहे, यासंदर्भातल्या सविस्तर खुलासा करून ते सर्व प्रकरण विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. शिवसेनेचे आमचे प्रमुख लोक आज विधिमंडळात जाऊन त्या संदर्भात सविस्तर अपील दाखल करणार आहेत. तक्रार दाखल करणार आहे.

– काल मर्यादा हा शब्द ठीक आहे,  विधानसभेचे अध्यक्ष वापरत आहेत. वेळेची मर्यादा नाही प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. सरकारला सुद्धा एक्सपायरी डेट असते. औषधाला असते प्रत्येकाला आहे. त्याच्यामुळे आम्हाला माहिती कायदा आम्हाला कळतो , न्यायालयाची प्रक्रिया आम्हाला कळते.

COMMENTS