Homeताज्या बातम्या

…पण दादांचा तो सकाळचा फोन पुन्हा कधीच येणार नाही !

स्व. अजित पवारांच्या आठवणीने आ. आशुतोष काळे गहिवरले कोपरगाव: माझ्या प्रत्येक वाढदिवशी सकाळी साडेसहा वाजता अजितदादांचा शुभेच्छांचा फोन यायचाच.

उच्च न्यायालयाच्या आदेशालाही हरताळ? केंद्रप्रमुख पदोन्नती प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी
अन्यायकारक लाठीहल्ल्याविरोधात जनक्रोधाचा उद्रेक; वंचित बहुजन आघाडीच्या ’महाराष्ट्र बंद’ला किनवटमध्ये अभूतपूर्व यश
मुंबई पोलीस दलात तब्बल ६.४१ कोटींचा वेतन घोटाळा उघड; दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मोठी कारवाई

स्व. अजित पवारांच्या आठवणीने आ. आशुतोष काळे गहिवरले

कोपरगाव: माझ्या प्रत्येक वाढदिवशी सकाळी साडेसहा वाजता अजितदादांचा शुभेच्छांचा फोन यायचाच. अनेक वर्षांची ती प्रेमाची परंपरा होती. पण यंदा तो फोन येणार नाही, ही जाणीव मनाला असह्य वेदना देणारी आहे. वाढदिवस दरवर्षी येईल,पण अजितदादा पुन्हा कधीच परत येणार नाहीत अशा शब्दांत आमदार आशुतोष काळे यांनी भावना व्यक्त करताच सभागृहातील वातावरण क्षणभर स्तब्ध झाले. कोपरगाव येथील कृष्णाई बॅन्क्वेट हॉलमध्ये आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शुभेच्छा सोहळ्यासाठी कोपरगाव मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली होती. शुभेच्छा स्वीकारण्यापूर्वी उपस्थितांशी संवाद साधताना स्व. अजितदादांच्या आठवणींनी आमदार काळे यांचा कंठ दाटून आला. यावर्षी वाढदिवस साजरा करण्याची मनापासून इच्छा नव्हती. आपल्या सर्वांचे लाडके नेते स्व. अजितदादा आपल्याला सोडून जाऊन सहा महिने झाले, पण मन अजूनही ते वास्तव स्वीकारू शकलेले नाही. आजही वाटते, दादा कुठेतरी भेटतील, पुन्हा एकदा प्रेमाने विचारपूस करतील. ही आशा मनातून जात नाही, असे ते भावूक स्वरात म्हणाले. स्व.अजितदादांच्या कार्याचा उल्लेख करताना आमदार काळे म्हणाले, “दादांनी आम्हाला माणुसकीची वाट दाखवली. जनतेची सेवा हेच जीवनाचे ध्येय असल्याचे शिकवले. संकटांशी दोन हात करत खंबीरपणे पुढे कसे चालायचे, याची प्रेरणा दिली. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आणि त्यांचे कार्य माझ्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शक म्हणून राहणार असल्याचे त्यानी सांगितले.यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

COMMENTS