मुंबई: भिवंडी शहरात बुधवारी झालेल्या भीषण अपघातात बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर एका भरधाव कारने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एका दुचा

मुंबई: भिवंडी शहरात बुधवारी झालेल्या भीषण अपघातात बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर एका भरधाव कारने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की, धडकेमुळे एक दुचाकीस्वार थेट उड्डाणपुलावरून खाली फेकला गेला. या घटनेत शाहरूख खान (वय ३२) आणि आलम शाह (वय ४७) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी तातडीने भिवंडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS