Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील धरणांत केवळ 37 टक्के पाणीसाठा

मुंबई : ऑक्टोबरपर्यंत पाऊस होऊनही यंदा मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत खालावला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करण

इंधन दरवाढीवरून केंद्र-राज्य संघर्ष
बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग तात्पुरता जागा
बच्चू कडू आक्रमक! सचिन तेंडुलकरच्या घरासमोर जोरदार आंदोलन

मुंबई : ऑक्टोबरपर्यंत पाऊस होऊनही यंदा मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत खालावला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सातही तलावांत सध्या 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून व जुलैमध्ये पाऊस किती पडतो यावर पाणीपुरवठयाचे नियोजन ठरणार आहे.
पावसाचे आगमन लांबल्यास मात्र पाणी कपातीची वेळ मुंबईवर येऊ शकेल. उन्हाचा ताप हळूहळू वाढू लागला आहे. एप्रिल महिना जवळ आला की मुंबईकरांनाही पाणी कपातीची चिंता भेडसावू लागते. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला व मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली होती. ऑक्टोबररच्या अखेरीस धरणांमध्ये 97 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पाण्याची वर्षभराची चिंता मिटली असे वाटत होते. मात्र अद्याप एप्रिल महिना सुरूही झालेला नसताना धरणांतील पाणीसाठा 37 टक्क्यांवर आला आहे. उन्हाळयाचे दोन महिने व पुरेसा पाऊस सुरू होईपर्यंतचे दोन महिने असे चार महिने याच पाणीसाठयावर मुंबईकरांची मदार असणार आहे. गेल्या वर्षी याच वेळी 40 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.  ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणांतून मुंबईला दर दिवशी 3800 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सातही तलावांतील पाणीसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटरवर पोहोचल्यानंतर मुंबईकरांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. तसेच तलावांतील उपलब्ध पाणीसाठा 31 जुलैपर्यंत पुरेल या दृष्टीने पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे नियोजन केले जाते. सर्व तलाव 1 ऑक्टोबररला पूर्ण क्षमतेने भरले असले तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहतो. तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत तर पाणी कपात करण्याची वेळ येते. या वर्षी अजून तरी पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून व जुलैमध्ये किती पाऊस पडतो त्यावर मुंबईच्या पाणीपुरवठयाचे भविष्य असेल.

COMMENTS