कोपरगाव : आजच्या वेगाने बदलणाऱ्या काळात, विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या युगात आपण पुढे जात असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांची

कोपरगाव : आजच्या वेगाने बदलणाऱ्या काळात, विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या युगात आपण पुढे जात असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांची जाणीव अधिक प्रकर्षाने होते. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्यासाठी शिक्षण हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अशोकराव काळे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाला माजी आ. अशोकराव काळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कोळपे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र मेहेरखांब, सुरेगावच्या सरपंच सुमन कोळपे, उपसरपंच सीमा कदम, माजी सरपंच शशिकांत वाबळे, सचिन कोळपे,पद्मविभुषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे संचालक रविंद्र निकम, यशवंत निकम,अंबादास धनगर, राजेंद्र मेहेरखांब,दादासाहेब जगताप,दिलीप शरमाळे, संजय ढोणे, पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब,मोतीराम निकम, राहुल डोखे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव उपसमितीचे अध्यक्ष परसराम मेहेरखांब, उपाध्यक्ष महेश निकम, सचिव अरुण लोंढे, खजिनदार राहुल बनकर, बाळनाथ साळवे, मनोज साळवे,शिवाजी साळवे, नरेंद्र गडवे, सुभाष डोलारे, प्रवीण गायकवाड, प्रवीण मेहेरखांब,कैलास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS