Homeताज्या बातम्या

आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार?

नांदेड: नांदेड जिल्हा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाचा राहिला आहे. विधानपरिषदेच्या या एका जागेवरून सुरू झालेला हा अंतर्गत वा

नांदेड विधान परिषद निवडणूक : अंकगणित भाजपच्या बाजूने, पण राजकारण अजूनही उघडेच!
महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; विजय निश्चित असल्याचा अशोकराव चव्हाण यांचा दावा
नांदेड विधान परिषद : नोटांच्या राजकारणाने निष्ठा गिळंकृत; राजूरकरांच्या विजयाने महाविकास आघाडीचा बुरखा फाटला!सत्तेच्या सौद्यात पक्षनिष्ठांचा बाजार; पडद्यामागील गुप्त हातमिळवणीने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले

नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांची कोंडी करण्याची रणनीती; विरोधकांसह मित्र  पक्षांचीही घेराबंदी Nanded Marathi News | Strategy to create a dilemma for Ashokrao  Chavan in Nanded ...

नांदेड: नांदेड जिल्हा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाचा राहिला आहे. विधानपरिषदेच्या या एका जागेवरून सुरू झालेला हा अंतर्गत वाद आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला महाग पडू शकतो, अशी भीती राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. जर निष्ठावंतांची नाराजी दूर करण्यात नेतृत्वाला अपयश आले, तर निवडणुकीच्या काळात अंतर्गत बंडखोरी किंवा निष्क्रियतेचा फटका पक्षाला बसू शकतो.

आता या सर्व वादावर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि स्वतः अशोकराव चव्हाण काय सुवर्णमध्य काढतात आणि निष्ठावंतांची मनधरणी कशी करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राजूरकर यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होते की पक्षांतर्गत नाराजी पाहता ऐनवेळी एखादा नवा ट्विस्ट पाहायला मिळतो, हे येणारा काळच ठरवेल.

COMMENTS