नांदेड: नांदेड जिल्हा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाचा राहिला आहे. विधानपरिषदेच्या या एका जागेवरून सुरू झालेला हा अंतर्गत वा

नांदेड: नांदेड जिल्हा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाचा राहिला आहे. विधानपरिषदेच्या या एका जागेवरून सुरू झालेला हा अंतर्गत वाद आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला महाग पडू शकतो, अशी भीती राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. जर निष्ठावंतांची नाराजी दूर करण्यात नेतृत्वाला अपयश आले, तर निवडणुकीच्या काळात अंतर्गत बंडखोरी किंवा निष्क्रियतेचा फटका पक्षाला बसू शकतो.
आता या सर्व वादावर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि स्वतः अशोकराव चव्हाण काय सुवर्णमध्य काढतात आणि निष्ठावंतांची मनधरणी कशी करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राजूरकर यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होते की पक्षांतर्गत नाराजी पाहता ऐनवेळी एखादा नवा ट्विस्ट पाहायला मिळतो, हे येणारा काळच ठरवेल.

COMMENTS