Homeताज्या बातम्या

गोव्यात भाजीपाल्याचे दर गगनाला!

पणजी : गोवा हे राज्य शेजारील राज्यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे जेव्हाही उत्पादन घटते, तेव्हा गोव्यातील भाज्यांचे भाव वाढतात. सध्या

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार; अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी-खांडे पारगाव शेतरस्ता; ५० वर्षांचा प्रश्न मार्गी
दुर्गम काचरवाडीच्या ऊसतोड कामगार कुटुंबातील ज्ञानेश्वरची ‘नीट’मध्ये घवघवीत कामगिरी; ५९० गुण मिळवत मिळवले उल्लेखनीय यश
भाजीपाला पिकवा, विक्रीची जबाबदारी राज्य सरकारची; शेतकऱ्यांना कृषी खात्याचे  आवाहन Goa Marathi News | grow vegetables and state government is  responsible for selling goa agriculture ...

पणजी : गोवा हे राज्य शेजारील राज्यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे जेव्हाही उत्पादन घटते, तेव्हा गोव्यातील भाज्यांचे भाव वाढतात. सध्याच्या हवामानाच्या परिस्थितीमुळे लागवडीवर परिणाम झाला आहे. कर्नाटकातून होणारा पुरवठा कमी झाल्याने आणि राज्यात मागणी वाढल्याने भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हा तुटवडा असाच कायम राहिल्यास भाव आणखी वाढू शकतात, असे पणजीतील विक्रेत्यांनी सांगितले.

वालपापडी ८० रुपयांवरून १२० ते १६० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे, तर आल्याचे भाव १६० रुपयांवरून ३०० ते ३२० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. काकडीचा भाव ४० रुपयांवरून ६० रुपये प्रति किलो झाला आहे. कोथिंबीर आता २० रुपयांऐवजी ३० ते ४० रुपये प्रति जुडी दराने विकली जात आहे. लसूण आकारानुसार २५० ग्रॅमसाठी ८० ते १०० रुपयांच्या दरम्यान आहे. फलोत्पादनाकडे मात्र भाज्यांचे दर स्थिर आहेत. बाजारात कांदा, बटाटा, टोमॅटो यांचा दर प्रतिकिलो ४० रुपये आहे, तर फलोत्पादनाकडे अनुक्रमे ३४, २६ आणि २५ असा दर आहे. कर्नाटकात कमी पाऊस पडल्याने भाज्यांचे उत्पादन घटून दरात वाढ झाल्याचे पणजीतील एका व्यापाऱ्याने सांगितले.

भाववाढीमुळे मोठ्या प्रमाणावर दिलेल्या ऑर्डरवर परिणाम झाला असून व्यापाऱ्यांचा नफाही कमी झाला आहे.

COMMENTS