Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्व विद्यापीठांमध्ये आदिवासी वसतिगृह उभारणार

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची ग्वाही

नंदुरबार :  राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये भूखंड उपलब्ध झाल्यास तेथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारणार असल्याचे प्रतिपादन आदिवा

कराड तालुक्यातील किल्ले वसंतगडच्या बुरूजांचे दुर्गार्पण सोहळा
महाविद्यालयाच्या आवारात तरुणांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा
जात पंचायतने एक रुपयात फोनवरच केला महिलेचा घटस्फ़ोट…

नंदुरबार :  राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये भूखंड उपलब्ध झाल्यास तेथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते शहादा तालुक्यातील शहादा, राणीपूर, गणोर, सुलतानपूर, मळगाव येथील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा मुलींचे वसतिगृह व शालेय इमारतींच्या पायाभरणी कार्यक्रम तसेच जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मोहिदा,लोणखेडा, उंटावद ,म्हसावद येथील पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आदिवासी बांधवांना शिक्षण देणे हा तर शासनाचा हेतू आहेच परंतु त्याना सक्षम आणि समृद्ध करण्यासाठीही आदिवासी विकास विभागामार्फत आम्ही प्रयत्नशील आहोत. भविष्यात केवळ शासनाने अनिवार्य केलेले शिक्षणच नाही तर ज्याला ज्या विषयातले शिक्षण व प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, ते आदिवासी विकास विभागामार्फत दिले जाईल. त्यासाठी गरजांवर आधारित सूचनांचे स्वागतच केले जाईल, असेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले. यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या विविध संधींमध्ये सहभागी होता यावे व प्रशासनात त्यांना करिअर करण्यासाठी राज्यात स्वतंत्र करिअर अकादमी निर्माण करण्यात येणार असून आठवीच्या वर्गापासूनच राज्यातील 500 विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात येणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उपजत काही अंगभूत क्रिडा व कलागुण असतात, त्यांच्या या उपजत व अंगभूत गुणांना प्रोत्साहन देवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू व कलावंत निर्माण करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत क्रिडा अकादमीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

COMMENTS