Homeताज्या बातम्या

कोल्हापुरात शिळे अन्न खाल्ल्याने 52 गायीचा मृत्यू

कोल्हापूर/प्रतिनिधी ः जिल्ह्यातील कणेरी मठामध्ये गेल्याा 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार

मच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू : विजय वडेट्टीवार
महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान : महसूल मंत्री बावनकुळे
प्रवरेच्या दोघांची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड; दाढ बुद्रुक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

कोल्हापूर/प्रतिनिधी ः जिल्ह्यातील कणेरी मठामध्ये गेल्याा 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान मागील काळात या लोकोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. याठिकाणी जनावरांचे प्रदर्शन सुरू आहे त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरांना आणण्यात येत आहे. या घटनेत आतापर्यंत बारा गायींचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. पठान यांनी दिली आहे.श्री सिद्धगिरी मठावर आयोजित सुमंगल सोहळ्यात देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्‍व, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

COMMENTS