मुंबई : हिंगोली पंचायत समितीमध्ये आयोजित पाणीटंचाई आढावा बैठक व घरकुल योजनेच्या बैठकीस गैरहजर राहणार्या तीन ग्रामसेवकांना तडकाफडकी निलंबित करण्य

मुंबई : हिंगोली पंचायत समितीमध्ये आयोजित पाणीटंचाई आढावा बैठक व घरकुल योजनेच्या बैठकीस गैरहजर राहणार्या तीन ग्रामसेवकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवक संघटनेत एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली पंचायत समिती कार्यालयामध्ये मंगळवारी ता 28 बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सूचना देऊनही उपस्थित न राहणार्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे.

COMMENTS