Homeताज्या बातम्या

आसाममधील 7 जिल्ह्यात पूरस्थिती ; मृतांची संख्या 87 वर

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महापुराचा फटका अद्यापही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये पूरस्

बालदिंडीने वांबोरी स्टेशन परिसर भक्तिमय; जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम उत्साहात संपन्न
आष्टीच्या डी. फार्मसी कॉलेजचा निकाल उत्कृष्ट; प्रथम वर्ष १०० टक्के तर द्वितीय वर्षाचा ९८ टक्के निकाल
पुण्यात खराब रस्त्याने घेतला महिलेचा बळी; चाकण एमआयडीसीत दुचाकी चिखलात घसरून भीषण अपघात, चालक फरार!
आसाममधील पूरात आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू; तीन लाख नागरिक विस्थापित |  Saamana (सामना)

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महापुराचा फटका अद्यापही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम असून एक लाख 28 हजारांहून अधिक नागरिक त्याचा फटका सहन करत आहेत. पूरामुळे आतापर्यंत 87 जणांचा मृत्यू झाला असून अनेक गावे, शेतीक्षेत्र आणि पायाभूत सुविधा पाण्याखाली गेल्या आहेत.

राज्यातील चराईदेव, शिवसागर, धेमाजी, गोलाघाट, बिश्‍वनाथ, जोरहाट आणि लखीमपूर हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. या सात जिल्ह्यांतील 24 महसूल मंडळांमधील तब्बल 380 गावे पुराच्या विळख्यात अडकली आहेत. अधिकृत माहितीनुसार, एकूण 1 लाख 28 हजार 71 नागरिकांना या आपत्तीचा फटका बसला असून सुमारे 14 हजार 230 हेक्टरहून अधिक शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पूराचा सर्वाधिक तडाखा अप्पर आसाम विभागातील शिवसागर, चराईदेव, जोरहाट आणि गोलाघाट या जिल्ह्यांना बसला आहे. त्यापैकी शिवसागर जिल्ह्यात परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक असून अनेक भागांमध्ये अजूनही पाणी ओसरलेले नाही. घरांमध्ये आणि रस्त्यांवर चिखल व पाणी साचल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वीज, वाहतूक आणि इतर मूलभूत सेवांवरही त्याचा परिणाम झाला आहे.

राज्य सरकारने मदत व बचावकार्याला वेग दिला असून मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्व सरमा यांनी 2 ऑगस्टपासून अप्पर आसाममध्ये मुक्काम ठोकून परिस्थितीवर थेट लक्ष ठेवले आहे. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सातत्याने आढावा घेऊन मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. सरकारी यंत्रणेसोबत स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या 3 ऑगस्टपर्यंतच्या अहवालानुसार, धनसिरी नदी नुमलीगड परिसरात अजूनही धोक्याच्या पातळीपेक्षा वरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शिवसागर जिल्ह्यात आणखी दोन मृतदेह आढळल्याने राज्यातील पूरबळींची संख्या 87 वर पोहोचली आहे.

पूरग्रस्त नागरिकांसाठी सरकारने 38 निवारा शिबिरे आणि 17 मदत वितरण केंद्रे सुरू केली असून एकूण 55 केंद्रांमधून मदतकार्य सुरू आहे. या शिबिरांमध्ये 11 हजार 66 नागरिकांनी आश्रय घेतला आहे. तसेच शिबिरांबाहेरील 184 नागरिकांनाही अत्यावश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. मदत आणि बचाव मोहिमेत राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सैन्य, अर्धसैनिक दल, हवाई दल, पोलीस, अग्निशमन व आपत्कालीन सेवा, स्थानिक प्रशासन, नागरी संरक्षण दल तसेच प्रशिक्षित स्वयंसेवक सक्रियपणे सहभागी झाले आहेत.

COMMENTS