Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जवळा ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला

शेतकरी ग्रामविकास आघाडीचा प्रचारात जोर

जामखेड ः जामखेड तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत जवळा मध्ये निवडणूक प्रचाराने जोर धरला असुन शेतकरी ग्रामविकास आघाडीचा जोर असल्याची ग्रामस्थांमधून चर्

Shrigonda : श्रीगोंदयातील राजकारणाला वेगळं वळण …कारखाना सभासदांनी केली ही मागणी l LokNews24
साहित्यातूनच शेतकरी आणि दलितांना उभे राहण्याचे सामर्थ्य मिळाले  
पगारवाढीसाठी अवतार मेहेरबाबा कामगारांची निदर्शने

जामखेड ः जामखेड तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत जवळा मध्ये निवडणूक प्रचाराने जोर धरला असुन शेतकरी ग्रामविकास आघाडीचा जोर असल्याची ग्रामस्थांमधून चर्चा सुरू झाली आहे. जवळा गावाच्या जडणघडणीत कै. श्रीरंग कोल्हे, किसनराव दळवी, प्रदीप आबा पाटील यांनी दिलेले मोठे योगदान ग्रामस्थांच्या मनामध्ये कायम आहे. त्याचप्रमाणे त्यांचे वारसदार जवळा गावातील सर्व समाजाशी सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत.
सरपंच व सदस्यपदाचे उमेदवार सर्वांभिमूख असलेले चेहरे असुन जवळा गावात आपल्या कामाने व समाजातील प्रत्येक घटकातील माणसांबरोबर सलोख्याचे संबंध  असलेले सरपंचपदाचे उमेदवार बाळासाहेब श्रावण आव्हाड तर सदस्यपदासाठी पांडुरंग उध्दव शिंदे, प्रदीप किसनराव दळवी, दीक्षा सूरज कांबळे, संतराम आदिनाथ सुळ, रूपाली राहूल लोंढे, रोहिणी दत्तात्रय वाळुंजकर, किसन दत्तात्रय सरोदे, प्रशांत भाऊसाहेब पवार, सिताबाई रामभाऊ पठाडे, दशरथ यदु हजारे, पूजा उमेश रोडे, सोनाली गौतम कोल्हे, नय्युम अस्लम शेख, ठकुबाई साधू हजारे, दैवशाला उमेश हजारे हे शेतकरी ग्रामविकास आघाडी जवळा पँनलने दिलेले उमेदवार लोकाभिमुख असुन प्रामाणिकपणाच्या कसोटीला उतरणारे आहेत असे ग्रामस्थांच्या चर्चेतून ऐकायला मिळत आहे.

अविश्‍वासच्या कारभाराला बसणार चपराक-मागच्या वेळी जागाओपन होती तरी अनेकांनी माघार घेऊन ज्येेष्ठांच्या सांगण्यावरून ज्यांना संधी दिली होती. त्यांनी सत्ता हाती येताच मनमानी कारभार करत पाच वर्षात एकाही ग्रामपंचायत सदस्याला काम दिले नाही. 15 ऑगस्ट 26 जानेवारी अशा राष्ट्रीय सणाला पाच वर्षे एकच अध्यक्ष ठेवला. पाच वर्षांत पक्ष बदलत फक्त सत्ता जपली. गावात इतर कोणालाही मानसन्मान दिली नाही. एकुणच असहकार व अविश्‍वासाचा कारभार केला. अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.

COMMENTS