Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाभिमानीने कराड-वाळवा तालुक्यातील साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली

इस्लामपूर : उसवाहतूक रोखण्यासाठी संघटनेने टायरमधील सोडलेली हवा. इंदोली : स्वाभिमानीने ट्रॅक्टरपेटवल्यानंतर वाढवलेला पोलीस बंदोबस्त. करा

मोहरे येथे तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
राष्ट्रवादीचा इस्लामपूर बाजार समितीवर 17-1 ने दणदणीत विजय
प्रवीण दरेकरांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा टोला

कराड / इस्लामपूर : कराड तालुक्यासह वाळवा तालुक्यात एफआरपीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून याचा भडका कराड तालुक्यात उडाला. कराड तालुक्यातील इंदोली मध्यरात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला होता. त्यानंतर सकाळी कराड तालुक्यातील वाठार येथे कृष्णा साखर कारखाना व वाळवा तालुक्यातील राजारामबापू व हुतात्मा सहकारी साखर कारखान्यांची ऊस वाहतूक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरली. यावेळी घटनास्थळी कराड तालुका पोलिसांनी धाव घेत कार्यकर्त्यांना सूचना केल्या.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 17 व 18 नोव्हेंबर रोजी ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मध्यरात्री कराड तालुक्यातील इंदोली येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटविण्यात आला. तर सकाळी वाठार येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे व शेतकरी यांनी ऊस वाहतूक रोखून धरली. कराड तालुका पोलिसांनी वाठार येथील चौकात चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच आंदोलकांनी हिंसक आंदोलन केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिला आहे. यावेळी पीएसआय दिपज्योती पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
इस्लामपूर शहरात ऊस वाहतूक रोखली; चाकातील हवा सोडली
चालू गळीत हंगामात उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे. या मागणीसाठी आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड बंद आंदोलनाच्या पहिल्या दिवशी हुतात्मा आणि राजारामबापू कारखान्याची ऊस वाहतूक रोखून धरली. इस्लामपूर-वाळवा रस्त्यावर बैलगाड्यांच्या चाकातील हवा सोडली तर बावची फाट्यावर राजारामबापूकडे ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर पोलिसांसमोर परत पाठवले.
उसाला एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानीने आज आणि उद्या दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. त्यापूर्वी वाळवा-शिराळा तालुक्यातील सर्व कारखान्याच्या व्यवस्थापनाना निवेदन देऊन आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहनही केले होते. मात्र, तरीही आज ऊसतोड आणि उसाची वाहतूक होत असल्याचे दिसल्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, आंदोलकांनी हुतात्मा कारखान्याकडे ऊस घेऊन जाणार्‍या बैलगाड्या रोखून कार्यकर्त्यांनी चाकातील हवा सोडून वाहतूक रोखली. त्यानंतर बावची फाट्यावरून राजारामबापू कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेले ट्रॅक्टर रोखून पोलिसांदेखत त्यांना परत फडात जाण्याची विनंती करत ही ऊस वाहतुक रोखली. आता जिथे ऊसतोड सुरू आहे ती बंद पाडण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी काव्याने फडात घुसणार आहेत. त्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे हे ऊस आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासनाकडून पोलीस बळाचा वापर सुरू : देवानंद पाटील
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलनाची हाक दिली आहे. कराड तालुक्यात आम्ही स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो आहे. आम्ही कृष्णा व राजारामबापू साखर कारखान्याची वाहने पुन्हा मागे पाठवली आहेत. परंतू शासन पोलीस बळाचा वापर करत आहे. आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही आम्ही आक्रमकपणे यापुढील काळात न्याय न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांनी दिला आहे.
ऊसतोड बंद आंदोलनाला प्रतिसाद द्या : राजू शेट्टी
साखरेची किमान विक्री किंमत 31 रुपयांवरुन 35 रुपये करणे आवश्यक आहे. तसेच इथेनॉल निर्मितीचा खर्च वजा करुन राहणार्‍या रकमेतील 70 टक्के रक्कम शेतकर्‍यांना द्यावी, सर्व प्रकारच्या इथेनॉलमध्ये प्रतिलीटर पाच रुपयांची वाढ करावी. तसेच खुल्या साखर निर्यात धोरणांतर्गत साखर निर्यातीला परवानगी द्यावी, आदी प्रमुख मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, प्रश्‍न सुटले नाहीत तर 18 तारखेपासून काय करायचे ते मी सांगतो असे शेट्टी म्हणाले. शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला ऊसतोड कामगार, वाहन चालक आणि साखर कारखानदारांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन राजू शेट्टींनी केले आहे.

COMMENTS