Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात सर्वदूर पावसाची दमदार हजेरी

बळीराजा सुखावला ; गोविंदांचा जल्लोष

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता, मात्र राज्यात गुरुवारी सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लाव

विरोधकांचा कामकाजांवर बहिष्कार
तुती रेशीम उद्योग-एक शेती पूरक उद्योग
विधानसभेत तुफान राडा; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता, मात्र राज्यात गुरुवारी सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावल्याचे चित्र दिसून येत होते, तर दुसरीकडे गोविंदांनी जोरदार जल्लोष करत, दहीहंडी उत्सावात साजरी केली. राज्यात बहुतांश भागात गुरुवारीसकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. आर्थिक राजधानी मुंबई, ठाणे, पालघर, अहमदनगर परिसरात झालेल्या पावसामुळे नागरिक सुखावले होते.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले होते. त्यांचा हा अंदाज यशस्वी ठरला असून, पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अद्यापही निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असतांना, हा पाऊस शेतकर्‍यांसाठी वरदान ठरतांना दिसून येत आहे. काल मुंबईसह राज्यात दहीहंडीचा जल्लोष सुरू असून पावसाच्या आगमनामुळे गोविंदा खुश झाले आहेत. तसेच वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना देखील दिलासा मिळाला आहे. मुंबईत काल सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईच्या सायन आणि दादर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. तर मुंबईच्या अनेक उपगनर भागात देखील पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. याचा परिणाम वाहतुकीवर झाला. मुंबईत अनेक ठिकाणची वाहतूक ही संथ गतीने पुढे जात होती. मुंबईसह पालघर आणि ठाणे परिसरातही जोरदार पाऊस झाला. पालघर मध्ये तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाल्याने येथील शेतकरी खुश झाले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, आज राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा खुश झाला आहे. महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. आज राज्यातील नंदुरबार, वाशिम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. नंदुरबार नवापूर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून पावसानं दांडी मारली होती. हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार काल नवापूर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस बरसला. वाशिम जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. तर मारठवड्यातील परभणी शहरात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

COMMENTS