Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

सांगली / प्रतिनिधी : सगळ्या चांगल्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. पक्षात नवी पिढी आली पाहिजे, नव्या पिढीने

शाम्पूपासून कॅन्सरचा धोका; जॉन्सननंतर युनिलिव्हर कंपनी अडचणीत
LokNews24 l जनसामान्यांचे हक्काचे; तुमचे आजचे राशीचक्र गुरुवार, २६ ऑगस्ट २०२१ l पहा LokNews24
माण तालुक्यातील सोन्या-छब्या बैल जोडीचा लंम्पीमुळे मृत्यू

सांगली / प्रतिनिधी : सगळ्या चांगल्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. पक्षात नवी पिढी आली पाहिजे, नव्या पिढीने नेतृत्व केले पाहिजे, हा विचार आमच्या पक्षात मुळापासूनच आहे. त्यामुळे काही अडचण नाही, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी रोहित आर. पाटील यांचे नाव न घेता केले.
ना. पाटील येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त रविवारी आले असता पत्रकारांशी बोलत होते. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांना मिळालेल्या यशामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्याला ना. जयंत पाटील यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला.
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. आर. आर. पाटील यांच्या पश्‍चात पहिल्यांदा रोहित पाटील हे नेतृत्वासाठी मैदानात उतरले. कवठेमहांकाळचे राजकारण आतापर्यंत घोरपडे-सगरे या गटापुरते मर्यादित राहिले. विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर तासगावचा भाग जोडल्यापासून येथील राजकारणात आबांचा गट, खा. संजय पाटील यांचा एक गट तयार झाला.
नगरपंचायत निवडणुकीमध्ये खा. पाटील व शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी राष्ट्रवादीच्या एका गटाला सोबत घेऊन शेतकरी विकास आघाडीच्या झेंड्याखाली पॅनेल मैदानात उतरवले होते. जागा वाटपात आबा गटाची कोंडी करून देईल. त्या जागा मान्य करत आघाडी करण्याची तयारी दर्शवली. मात्र, रोहित पाटील यांनी अवमानकारक तडजोडीला नकार देत राष्ट्रवादीच्या चिन्हावर पॅनेल मैदानात उतरवले. लोकांनी या नेतृत्वाला साथ देत 10 जागा देत आबा गटावर विश्‍वास दर्शवला. घोरपडे-सगरे-खासदार गटाला सत्तेपासून दूर ठेवत बदलत्या राजकारणाची दिशाही निश्‍चित केली.
दरम्यान, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा उध्दव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तीमत्व महाराष्ट्र कधीच विसरणार नाही अशा शब्दात मंत्री पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
गोव्यात राष्ट्रवादी-शिवसेनेला चांगले यश मिळेल : पाटील
गोव्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असती तर अधिक आनंद झाला असता. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी त्याठिकाणी एकत्रित आहे. त्यांना मोठे यश मिळेल, असा विश्‍वास मंत्री जयंत पाटील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

COMMENTS