Homeताज्या बातम्या

‘स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू’ मोहिमेद्वारे ग्रामीण स्वच्छता व पर्यावरण संवर्धन करा

बीड मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आवाहन बीड : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा उपक्रम राबविला जात आहे. स्वच्छतेच्या या

जिल्हा परिषदेतील अतिरिक्त कामकाज नावाखाली चालणारा प्रतिनियुक्तयांचा बाजार उठवला !डॉ. गणेश ढवळे यांच्या पाठपुराव्याला यश
मी म्हणेल तोच कायदा; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप
शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांवर 100 रुपये बाँडचा अडथळा’300 पेक्षा जास्त मेडिकल प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळलेबाँड व नोटरीची अट दूर करून सर्व मेडिकल प्रस्ताव तातडीने निकाली काढावे : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची मागणी
मुख्यपृष्ठ | पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग | भारत

बीड मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आवाहन

बीड : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा उपक्रम राबविला जात आहे. स्वच्छतेच्या या चळवळीत सर्व ग्रामस्थांनी स्वतःच्या कुटुंबापासून सहभागी व्हावे. स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत गावाचा ठोस आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जितिन रहमान यांनी केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यांच्या सूचनेनुसार ५ जून २०२६ रोजी ‘स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करणे, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतींमधील कंपोस्ट खड्डे, कचरा वर्गीकरण शेड, कचरा संकलन वाहने यांची कार्यस्थिती तपासली जाईल. तसेच जुन्या कचरा डेपोची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची (BWG) यादी तयार केली जाणार आहे. ४ जून रोजी प्रभात फेरी, शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धा, महिला बचत गट संवाद आणि ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण उपक्रम राबवले जात आहेत. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष ग्रामसभांचे आयोजन करून या सर्व कामांचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती जितिन रहमान यांनी दिली.

COMMENTS