आजच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात केवळ अभ्यास करून चालत नाही, तर योग्य नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन करूनच सरकारी नोकरीचे ध्येय गाठता येते, असे प्रत

आजच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात केवळ अभ्यास करून चालत नाही, तर योग्य नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन करूनच सरकारी नोकरीचे ध्येय गाठता येते, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे उपव्यवस्थापक दिनेश आसाराम शेळके यांनी केले. शहरातील आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित ’पब्लिक सेक्टर पाथवेज: मास्टरक्लास ऑन एक्झाम स्ट्रॅटेजी या विशेष मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाएमपीएससी, यूपीएससी आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, यासाठी या मास्टरक्लासचे आयोजन आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश बहादूरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विभागप्रमुख प्रा. कावळे एस. एम., प्रा. चव्हाण सी. एच., प्रा. गरकळ एम. बी. आणि प्रा. चौधरी एस. एस. यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. चव्हाण सी. एच. यांनी केले. दीड तास चाललेल्या या सत्रात शेळके यांनी परीक्षा नियोजन या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अभ्यासाची सुरुवात आणि विषयांची विभागणी कशी करावी., वेळेचे व्यवस्थापन दररोजचा अभ्यास आणि प्रत्यक्ष परीक्षेतील वेळेचे नियोजन, स्वतःच्या अनुभवातून त्यांनी परीक्षेत प्रश्नांना सामोरे जाण्याची अचूक पद्धत समजावून सांगितली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. निलेश बहादूरे आणि प्रा. एस. एम. कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. चव्हाण सी. एच., प्रा. गरकळ एम. बी., प्रा. चौधरी एस. एस., प्रा. सातपुते व्ही. एस. आणि प्रा. गाडे आकाश यांनी परिश्रम घेतले. प्रथम वर्ष अभियांत्रिकीची विद्यार्थिनी प्राची हातवटे हिने आभार मानले.

COMMENTS