Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांवर पुन्हा लाठीचार्ज ; रविकांत तुपकरांची आक्रमक भूमिका

बुलढाणा प्रतिनिधी - सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेत मालाला भाव नाही..सोयाबीन, कापूस आणि हरबरा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. हरबरा उत्पादक शेतकर

jalgaon:भुसावळ तालूक्यातील फुलगांव येथे पाणी प्रश्न पेटला | LOKNews24
तांभेरेचे पोलिस पाटील मुसमाडे यांना प्रांतधिकारी यांनी केले निलंबित
कोपरगाव-झगडेफाटा रोडवर कंटेनरने रिक्षाला चिरडले ; सात ठार तीन जखमी

बुलढाणा प्रतिनिधी – सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेत मालाला भाव नाही..सोयाबीन, कापूस आणि हरबरा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. हरबरा उत्पादक शेतकरी आज अमरावती येथील नोंदणी खरेदी कार्यालयावर नोंदणीसाठी गेले होते..या ठिकाणी पोलिसांनी शेतकर्‍यां वर लाठीचार्ज केला आहे.नेमके सरकारला करायचे तरी काय..सरकारला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मतावर हे सरकार आलेलं आहे.. सरकारला सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आलेला आहे.. अतिशय तालिबानी पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांसोबत वागत आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.. सरकारच्या इशाऱ्यावर शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठी चार्ज करण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रातल्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. 

COMMENTS