Homeताज्या बातम्या

मध्य प्रदेशातील भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगरच्या चौघांचा मृत्यू; दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील घटना

मंदसौर: मध्य प्रदेशातील मंदसौर येथे दिल्ली-मुंबई ८ लेन एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव वेगातील कारने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमा

बहिस्थ शैक्षणिक अर्हतेस कार्योत्तर मंजुरीचा मार्ग मोकळा; गटविकास अधिकाऱ्यांना अधिकार मिळाल्याने शिक्षकांना मोठा दिलासा
महिला भाविकाची हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत
वाळूतस्करांवर कारवाई होते, मग ४२ कोटींच्या बोगस वृक्षलागवडीची चौकशी का नाही? डॉ. गणेश ढवळेंचा आ. विजय सिंह पंडितांना सवाल
मंदसौर में दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे पर ट्रक में घुसी कार, महाराष्ट्र के  चार लोगों की

मंदसौर: मध्य प्रदेशातील मंदसौर येथे दिल्ली-मुंबई ८ लेन एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव वेगातील कारने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अत्यंत भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला.

सीतामऊ पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त रेनॉल्ट ट्रायबर कारमधून एकूण सहा जण प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून ते दिल्लीच्या दिशेने जात होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर कारमधील प्रवासी सुमारे एक तास आतमध्येच अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

COMMENTS