Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलांच्या कलाविष्कारातून समता इंटरनॅशनल स्कूलची उडान – गोविंद शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी : सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत ध्वजारोहण होत असताना महाराष्ट्राच्या रथातून आपल्या संस्कृतीचे दर्शन झाले आणि संध्याकाळी

आत्महत्या करण्याची पोस्ट करून तो झाला बेपत्ता…
पद्मश्री पोपटराव पवार यांची राहीबाई पोपेरे यांनी बीज बँकेस दिली भेट
कर्मवीर शिक्षणक्षेत्रातील जननायक ः प्राचार्य टी. ई. शेळके

कोपरगाव प्रतिनिधी : सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत ध्वजारोहण होत असताना महाराष्ट्राच्या रथातून आपल्या संस्कृतीचे दर्शन झाले आणि संध्याकाळी समता इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या कलाविष्कारातून भारत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. मुलांनी केलेल्या सादरीकरणातून समता स्कूलची उडान प्रशंसनीय आहे.या उपक्रमामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला आणि त्यांच्या कलेचा अप्रतिम आविष्कार पहायला मिळाला.असे मत शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी  समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये उडान 2022 – 23 या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.

या प्रसंगी शिर्डी विमानतळाचे डेप्युटी कमांडर अमिश कुमार, संजीवनी गोविंद शिंदे, शाळेचे संस्थापक काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाह  संदीप कोयटे, समता पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन श्‍वेता अजमेरे, ज्येष्ठ संचालक  अरविंद पटेल,  गुलाबचंद अग्रवाल,  चांगदेव शिरोडे,  कांतीलाल जोशी,  गुलशन होडे, सिमरन खुबानी, हर्षल जोशी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदींसह विद्यार्थ्यांचा पालक वर्ग, हितचिंतक परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य  समीर अत्तार यांनी सांगितले की, ब्रिटिश कौन्सिल कडून शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा पुरस्कार, खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरीसोबत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कृती कार्यक्रमाचे आयोजन, रंगोत्सव स्पर्धा तसेच आर्ट वोल्कॅनोत मुलांचे यश यांसह स्कूलचा प्रगतीचा वार्षिक अहवाल सादर केला. मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे यांनी बोलतांना सांगितले की, दरवर्षी घेत असलेल्या उपक्रमामुळे शिक्षक आणि पालक यांचे संबंध दृढ होण्यास अधिक मदत होते. या वर्षी ’उडान’ (आजादी से बुलंदी तक) संकल्पनेच्या आधारे भारत स्वतंत्र होण्यासाठी जे देशभक्त, समाज सुधारक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947 पासून भारत देशाने सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेणारे हे स्नेहसंमेलन आहे.तसेच समता स्कूल उभ्या असलेल्या ठिकाणी 12 वर्षांपूर्वी पिण्याचे पाणी देखील 4 कि.मी.अंतरावरून आणावे लागत असे. त्या ठिकाणी आज समताच्या मॅनेजमेंटने सेमी ऑलिंपिक साईजचा स्विमिंग पूल उभारून मुलांच्या शारीरिक विकासाच्या दृष्टीने देखील उडान घेतली असल्याचे मत कोयटे यांनी व्यक्त केले.

COMMENTS