Homeताज्या बातम्या

आ. विजय राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली फारूख पटेल यांनी पटेल नगर भागाची पाण्याची समस्या दूर केली :- शेख युनूस

बीड जिल्ह्यातील गेवराई मतदार संघाचे दबंग आ. विजय सिंह राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली मा. उपनगराध्यक्ष विनोद मुळूक ,मा.फारुख पटेल साहेब गटनेते, त

सामाजिक कार्याची दखल; शांताराम गणेश खुडे यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026 जाहीर
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट-बीड शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी निधीची मागणी-बीड शहर, ग्रामीण भागातील विविध विकासकामांबाबतही निवेदन सादर
बीड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था9 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करा – डॉ. गणेश ढवळे यांची आ. संदीप क्षीरसागरांकडे मागणी



बीड जिल्ह्यातील गेवराई मतदार संघाचे दबंग आ. विजय सिंह राजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली मा. उपनगराध्यक्ष विनोद मुळूक ,मा.फारुख पटेल साहेब गटनेते, तसेच खदीर सेठ बोरखडी वाले, शेख जाकेर भाई,शेख पाशाभाई, शेख इलियास यांच्यामुळे तेलगाव नाका पटेल नगर भागात पंधरा-वीस वर्षापासून पाण्याची समस्या नागरिकांना सहन करावी लागत होती. जल अंतर्गत योजनेखाली फक्त मोठी पाईप लाईन जोडून कनेक्शन देण्यात आले होते. पण पाण्याची पाईपलाईन अजून जोडण्यात आलेली नव्हती. ही समस्या पटेल नगर भागातील नागरिकांनी फारूख पटेल, खदीर सेठ बोरखडी वाले, जाकेर भाई, पाशाभाई यांच्या कडे सांगितली आणि त्यांच्या प्रयत्नामुळे पटेल नगर भागातील रहिवासांचे पाण्याचे प्रश्न दूर झाले. समस्त पटेल नगर भागातील रहिवासी यांनी  आ.विजय राजे पंडित,फारुख पटेल, खदीर सेठ, जाकेर भाई, पाशा भाई यांचे आभार मानले.

COMMENTS