Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पाटोदा तालुक्यात सोलार प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसादकेंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी नवी दिल्लीत सविस्तर चर्चा

पाटोदा तालुक्यात राबविण्यात येणार्‍या विविध सौरऊर्जा   प्रकल्पांच्या अनुषंगाने केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांची नवी दिल्ली येथे

चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 1599 प्रकरणे निकाली
महिला आरक्षणाला विरोध करणार्‍या काँग्रेसविरोधात बीडमध्ये भाजपचे आंदोलनकाँग्रेसने महिलांच्या प्रगतीला अडथळा निर्माण केला -डॉ.सारिकाताई क्षीरसागर



पाटोदा तालुक्यात राबविण्यात येणार्‍या विविध सौरऊर्जा   प्रकल्पांच्या अनुषंगाने केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांची नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान तालुक्यातील सौरऊर्जा प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रगतीचा आढावा तसेच भविष्यातील विस्तारीकरणाच्या योजना यावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीत पाटोदा तालुक्यातील उपलब्ध सौरऊर्जा क्षमता, जमीन उपलब्धता, सध्याचे प्रकल्प आणि भविष्यातील मोठ्या प्रमाणावरील गुंतवणुकीच्या संधी यावर सखोल विचारविनिमय करण्यात आला. विशेषतः ग्रामीण भागात शाश्वत ऊर्जा निर्मिती वाढवून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, उद्योगवाढ आणि पायाभूत विकासाला चालना देण्यावर भर देण्यात आला. या प्रसंगी पाटोदा तालुक्यातील ऊर्जा क्षेत्रात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक सहकार्य, केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ, तसेच खाजगी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्याच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. सौरऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून तालुक्याला ऊर्जा स्वयंपूर्ण करण्याचा उद्देश या बैठकीत अधोरेखित करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या सर्व मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकारकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सौरऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्रातील संभाव्य क्षमता मोठी असून, पाटोदा तालुक्यासारख्या भागात हे प्रकल्प प्रभावीपणे राबवले जावेत, असेही त्यांनी नमूद केले. या भेटीनंतर पाटोदा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला आणि ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. सौरऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होऊन आर्थिक विकासालाही गती मिळणार असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

COMMENTS