Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करावी

कर्जतचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे शेतकर्‍यांना आवाहन

कर्जत/प्रतिनिधी ः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या सर्व पात्र शेतकर्‍यांनी लाभाचे हप्ते सुरळीत बँक खात्यात जमा

ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ निर्माण व्हावी :- फिरोजभाई पठाण
टपाल खात्यामार्फत सूर्यघर योजनेचे सर्वेक्षण सुरु
कळंबमध्ये डॉ. आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी

कर्जत/प्रतिनिधी ः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या सर्व पात्र शेतकर्‍यांनी लाभाचे हप्ते सुरळीत बँक खात्यात जमा होण्याकरीता त्यांचे बँक खाते इ- केवायसी करणे बंधनकारक आहे. कर्जत तालुक्यात एकूण लाभार्थींची संख्या 48689 एवढी आहे. त्यातील 9443 लाभार्थ्यांनी इ- केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात निधी वर्ग केला जात नाही. अशा लाभार्थ्यांनी नजीकच्या सीएससी, महाऑनलाईन सेंटर येथे जावून इ- केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन कर्जतचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे. याबाबत माहिती देताना नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे म्हणाले, इ- केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या कर्जत तालुक्यातील सर्व तलाठ्यांकडे देण्यात आलेल्या आहे. या याद्या वंचित असलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. इ- केवायसी राहिलेल्या लाभार्थ्यांनी आधारकार्ड व योजनेसाठी दिलेला मोबाईल क्रमांक (ओटीपी मिळवण्यासाठी) घेवून नजीकच्या सीएससी, महाऑनलाईन सेंटर येथे जावून इ- केवायसी पूर्ण करून घ्यावी.

COMMENTS