Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांची अडवणूक

सभापती शरद कारले यांनी दिला उपोषणाचा इशारा

जामखेड ः जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांनी 31 मार्चपूर्वीच आपल्या कर्जाचा भरणा केलेला असतानाही विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांना कर्जपुरवठा करण

मनामनात श्रीराम भक्तीची ज्योत पेटवा – प्रदीप महाराज नलावडे
साखर संघाकडे लक्ष देता, पण गरीबांच्या महामंडळांकडे दुर्लक्ष ; माजी मंत्री ढोबळेंची सरकारवर टीका
कोळगावथडी सोसायटीच्या अध्यक्षपदी दीपक राऊत

जामखेड ः जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांनी 31 मार्चपूर्वीच आपल्या कर्जाचा भरणा केलेला असतानाही विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांना कर्जपुरवठा करण्यास अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जामखेड शाखेकडून होणारी अडवणूक थांबवावी अन्यथा शेतकरयांसह उपोषणास करणार असल्याचा इशारा बाजार समितीचे सभापती शरद कारले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबतचे रितसर दिलेल्या निवेदनात केली म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील घोडेगांव, पाटोदा, डिसलेवाडी, जातेगांव, धनेगांव या गावातील शेतकर्‍यांनी दि. 31 मार्च पूर्व आपल्या कर्जाचा भरणा केलेला आहे. परंतू मागील काही दिवसांपासून वरील गावच्या शेतकर्‍यांची कर्जासाठी अडवणूक केली जात आहे. तसेच अद्याप पर्यंत या सोसायट्यांना कर्ज वाटप केलेले नाही. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असलेमुळे शेतकर्‍यांचे उत्पादनात घट झाली अशा परिस्थितीमध्ये जर शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज पुरवठा झाला नाही तर शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते. तरी आपण सदर अर्जाची दखल घेऊन जामखेड तालुक्यातील 1) घोडेगांव पाटोदा डिसलेवाडी जातेगाव धनेगाव या गावातील वि.का.से. सहकारी संस्थांना तात्काळ कर्ज पुरवठा करावा शेतकरयांची अडवणूक थांबवावी अन्यथा  अहमदनगर येथे शेतकरयांसह उपोषणास बसणार आहे. या निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, संचालक सचिन घुमरे, डॉ. गणेश जगताप, भागवत जायभाय, घोडेगांव सोसायटीचे चेअरमन विष्णू भोंडवे, धनेगाव सोसायटीचे चेअरमन तुराब शेख यांच्या सह्या आहेत. तसेच निवेदन देताना हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS