मुंबई: राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जवरून आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले असताना, भाजपने विरोध

मुंबई: राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जवरून आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले असताना, भाजपने विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन हे केवळ सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी आणि देशातील युवकांच्या मनात द्वेष निर्माण करण्यासाठी रचलेली निव्वळ ‘नौटंकी’ आहे, असा थेट आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
एवढेच नव्हे तर, आंदोलनादरम्यान दगडफेक करण्यासाठी तब्बल २ ते ३ ट्रक भरून गोठे (दगड) आणले गेले होते, असा खळबळजनक दावाही बावनकुळे यांनी केला. यामागे असलेल्या असामाजिक घटकांची कसून व कडक चौकशी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

COMMENTS