Homeताज्या बातम्या

दिल्लीतील आंदोलन केवळ नौटंकी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांवर जोरदार पलटवार

मुंबई: राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जवरून आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले असताना, भाजपने विरोध

सोलापूरमधील ‘सद्गुरू बसवारूढ महास्वामींचा मठ’ उडवून देण्याची धमकी; संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात
खा. बजरंग सोनवणेंकडून महामार्गाच्या कामाची पाहणी; रखडलेल्या कामांत घातले लक्ष
कोयत्याने वार करून जबरी चोरी करणार्‍या टोळीला बीड एलसीबीने ठोकल्या बेड्या; इंदापूरमधून तीन आरोपी गजाआड
Chandrashekhar Bawankule Statement On Delhi Protest | BJP Politics

मुंबई: राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जवरून आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले असताना, भाजपने विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन हे केवळ सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी आणि देशातील युवकांच्या मनात द्वेष निर्माण करण्यासाठी रचलेली निव्वळ ‘नौटंकी’ आहे, असा थेट आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

एवढेच नव्हे तर, आंदोलनादरम्यान दगडफेक करण्यासाठी तब्बल २ ते ३ ट्रक भरून गोठे (दगड) आणले गेले होते, असा खळबळजनक दावाही बावनकुळे यांनी केला. यामागे असलेल्या असामाजिक घटकांची कसून व कडक चौकशी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

COMMENTS