श्रेयाकडे लक्ष, कोरोनाकडे दुर्लक्ष  ; अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची मोदी सरकारवर टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रेयाकडे लक्ष, कोरोनाकडे दुर्लक्ष ; अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची मोदी सरकारवर टीका

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा भारताला जोरदार तडाखा बसला असताना त्याच वेळी ऑक्सिजन आणि लसीच्या तुटवड्याचे दुसरे संकट देशासमोर उभे राहिले.

पवना धरण भरले; मुळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा घट
अखेर तरगावफाट्याला न्याय; रस्त्याच्या सुधारणेसाठी तीन कोटींचा निधी मंजूर

नवीदिल्लीः कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा भारताला जोरदार तडाखा बसला असताना त्याच वेळी ऑक्सिजन आणि लसीच्या तुटवड्याचे दुसरे संकट देशासमोर उभे राहिले. या पार्श्‍वभूमीवर काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली असताना आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी भारतातील कोरोनाच्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका केली आहे. 

    या सर्वच बाबतीत एकूणच संभ्रमावस्थेत असलेल्या केंद्र सरकारने झालेल्या गोष्टींचे श्रेय घेण्यावरच लक्ष केंद्रीत केले. कोरोनाचा प्रसार रोखण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आणि भारतात करोनाची ही परिस्थिती निर्माण झाली, असे ते म्हणाले. याआधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. फौची यांनीदेखील भारतातील कोरोना परिस्थितीवरून परखड भूमिका मांडली होती. त्यानंतर आता सेन यांनी केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक धोरणावर ताशेरे ओढले आहेत. भारत औषध निर्मितीच्या बाबतीत समर्थ आहे. त्यामुळे भारत कोरोनाच्या साथीचा योग्य प्रकारे सामना करू शकला असता; मात्र सरकारी पातळीवर असलेल्या संभ्रमामुळे आपल्या बलस्थानांकडे आपण लक्ष केंद्रीत करू शकलो नाही, असे ते म्हणाले. शुक्रवारी मुंबईत राष्ट्र सेवा दलातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, अमर्त्य सेन यांनी केंद्र सरकारच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांवरदेखील आक्षेप घेतला. केंद्र सरकार जागतिक स्तरावर आपली अशी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत राहिले, की भारत संपूर्ण जगाला वाचवेल; पण त्याचवेळी देशात कोरोनाची समस्या वाढण्यासाठी आणि लोकांना त्याचा विळखा बसण्याकडे दुर्लक्ष करत राहिले. भारतात आधीच असलेल्या सामाजिक असमानता, विकासाचा मंद वेग आणि बेरोजगारी या समस्या कोरोना साथीच्या काळात अजूनच गंभीर झाल्या आहेत, असे ते म्हणाले.

COMMENTS