Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाकने आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देवू ; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात गुरूवारी राजधानीत सर्वपक्षीय नेत्

सध्याच्या पिढीला धर्मसत्ताक उन्मादाशी तीव्र संघर्ष करावा लागणार : निरंजन टकले
गौतम पब्लिक स्कूलमध्ये बटालियनचा प्रशिक्षण कॅम्प
पर्यटन विकास आराखड्यात कोपरगावला प्राधान्य द्या

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात गुरूवारी राजधानीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी या बैठकीला संबोधित करतांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारताला परिस्थिती आणखी चिघळायची नाही. पण जर पाकिस्तानने काही आगळीक केल्यास भारत शांत बसणार नाही. या बैठकीला राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतर काही मंत्री उपस्थित होते. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगेंनीही बैठकीला हजेरी लावली होती.

COMMENTS