‘या’ राज्यात भाजपाच सरकार बनविणार… फडणवीसांना विश्वास

Homeताज्या बातम्याराजकारण

‘या’ राज्यात भाजपाच सरकार बनविणार… फडणवीसांना विश्वास

वेब टीम : पणजीकाँग्रेससमोर पक्षाचे अस्तित्त्व टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. पक्ष नेतृत्वाचा मोठा प्रश्न आहे. आम आदमी पक्ष केवळ पोस्टरबाजी करण्यात व्यग्

शरद पवार यांना द्रोणाचार्य म्हणणे म्हणजे द्रोणाचाऱ्याचा अपमान…
उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार-मलिक (Video)
लातूर पोलीस दलात अत्याधुनिक 15 चारचाकी वाहने दाखल

वेब टीम : पणजी
काँग्रेससमोर पक्षाचे अस्तित्त्व टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. पक्ष नेतृत्वाचा मोठा प्रश्न आहे. आम आदमी पक्ष केवळ पोस्टरबाजी करण्यात व्यग्र आहे. राज्य चालवण्यासाठी आचार, विचार आणि नीती लागते.

अराजकतेनं अस्तित्व दाखवता येते पण राज्य चालवू शकत नाही, असा खरमरीत टोला फडणवीस यांनी काँग्रेसला आणि आम आदमी पक्षाला लगावला. तसेच २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप पूर्ण आणि अश्वासक बहुमताने गोव्यात सरकार बनवेल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

त्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षाला लक्ष्य केले.

काँग्रेससमोर अस्तित्वाचं आणि नेतृत्वाचं संकट असल्याचा घणाघात फडणवीस यांनी यावेळी केला. तसेच भाजप (BJP) पूर्ण आणि अश्वासक बहुमताने गोव्यात पुन्हा सरकार बनवेल असा दावाही केला. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंतही (Pramod Sawant) उपस्थित होते.

मजबूत सरकार आणि मजबुत संघटन घेऊन भाजप या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असून, ऐतिहासिक विजय मिळवू. देशाला योग्य दिशेने पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात होऊ शकते, याची जाणीव जनतेला झाली आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

गोवा सरकारने लसीकरणात मोठी आघाडी घेतली. १०० टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात अनेक दुर्बल घटकांना विविध प्रकारची मदत करण्याचे काम गोवा सरकारने केले.

पूरग्रस्तांनाही मोठी मदत, रोजगाराच्या क्षेत्रातही मोठं काम झालं आहे. सरकार आपल्या दारी हा उपक्रमही तितकाच महत्वाचा आहे. जनतेचे प्रश्न तात्काळ आणि त्याच ठिकाणी निकाली काढण्यासाठी त्याची मोठी मदत होणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

COMMENTS