Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसंत मोरेंचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र

  मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले बडे नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. वसंत मोरे यां

वसंत मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट
चंद्रा गाण्यावर वसंत मोरे यांनी धरला ठेका
पुण्यातून वसंत मोरे लढणार लोकसभा

  मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले बडे नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. वसंत मोरे यांनी फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला आणि त्यांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या फोटो समोर ते उभे आहेत, त्यांनी हात जोडले आहेत साहेब मला माफ करा असं वसंत मोरे म्हणत आहेत आणि त्यांनी आपण मनसे सोडल्याचं जाहीर केलं आहे. माझ्या नाराजीचा कडेलोट झाला त्यामुळे मी आता पक्ष सोडला आहे. माझ्याविरोधात सातत्याने काही गोष्टी पसरवल्या जात होत्या. तसंच त्या गोष्टींची शहानिशा न करता मला निष्ठा सिद्ध करावी लागत होती. मी फक्त अग्निपरीक्षाच देणं बाकी होतं असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. “एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो.” ही पोस्ट वसंत मोरेंनी लिहिली आहे. शहराध्यक्ष पदावरुन काढल्यानंतर वसंत मोरे यांची नाराजी वाढली होती. तसंच रुपाली पाटील यांनीही भाऊ तुम्ही आमच्याबरोबर या असं म्हटलं होतं. मात्र वेळोवेळी मी मनसेसह आहे हे सांगत होते आणि ते मनसेबरोबरच राहिले. मात्र मध्यरात्री त्यांनी जी पोस्ट केली त्यानंतर ते पक्ष सोडणार अशा चर्चा रंगल्या होत्या, ही पोस्ट केल्यानंतर १३ व्या तासाला त्यांनी पक्ष सोडला आहे.

वसंत मोरे हे पुण्यातले मनसेचे धडाडीचे नेते होते, त्यांनी आता पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. ते कुठल्या पक्षात जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दोन दिवसांत आपण भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एखादी समस्या आली, कुठे काही अन्याय होताना दिसला तर त्या ठिकाणी हजर राहून ते लोकांच्या अन्यायाला, समस्येला वाचा फोडतात हे बऱ्याचदा दिसून आलं होतं.. लोकांमध्ये ते याचमुळे प्रसिद्ध झाले. इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरेंना पक्षात कुणाचा त्रास होतो आहे? त्यांची ही खदखद अशी का बाहेर येते आहे? हे प्रश्न आता त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे उपस्थित होत होते. आता त्यांनी आपल्या पक्षाला आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलेलं असताना वसंत मोरेंनी पक्ष सोडणं हा राज ठाकरेंसाठी धक्का मानला जातो आहे.

COMMENTS