Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय जय महाराष्ट्र माझा’ गाण्याला राज्यगीताचा दर्जा

मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल 62 वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळाले आहे. महाराष्ट्राची महती सांगणारे आणि

निरोगी व सदृढ आरोग्यासाठी स्वच्छता व पर्यावरण संवर्धन काळाची गरज -संजय सपकाळ
रिक्षा व मोटरसायकल चोरणारा सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात I LOKNews24
शिंदे गटाचे खासदार गावितांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल 62 वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळाले आहे. महाराष्ट्राची महती सांगणारे आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाची चेतना जागवणारे ’जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत यापुढे महाराष्ट्राचे राज्यगीत असेल.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 19 फेब्रुवारीपासून हे गीत अंगीकारण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक ठराविक गीत असावे, असे केंद्र सरकारने सुचवले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आली आहे.’जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा यापूर्वीच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. अखेर त्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व मोठ्या शासकीय कार्यक्रमांमध्ये हे गीत लावले जाणार आहे. महाराष्ट्र गौरव गीत अशी ’जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची ओळख आहे. विशेषत: सीमा आंदोलनादरम्यान हे गाणे आंदोलकांच्या तोंडी होते. कवी राजा बढे यांनी हे गीत लिहिले आहे. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत शाहिर अमर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजाने अजरामर केले आहे.

COMMENTS