Homeताज्या बातम्यादेश

इंडिया आघाडीची पहिली सभा होणार भोपाळमध्ये

समन्वय समिती बैठकीत जागावाटपाच्या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः इंडिया आघाडीने आगामी लोकसभा निवडणुका लढण्यासाठी कंबर कसली असून, त्यादृष्टीने एकत्र येत, आगामी रणनीती आखण्यात येत असून, त्य

अनैतिक संबंधातून मुलांनीच जन्मदात्यांची केली हत्या
सुवेंदू अधिकारी यांच्या भावावर मतदानाच्या दिवशी हल्ला
जिओ एअर फायबर’ गणेश चतुर्थीला होणार लॉन्च

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः इंडिया आघाडीने आगामी लोकसभा निवडणुका लढण्यासाठी कंबर कसली असून, त्यादृष्टीने एकत्र येत, आगामी रणनीती आखण्यात येत असून, त्यादृष्टीने इंडिया आघाडीची पहिला सभा मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये होणार असून, समन्वय समितीच्या बैठकीतून राज्यस्तरावर जागावाटपाच्या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भोपाळच्या सभेतून विरोधकांकडून आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले जाईल. केरळ व पश्‍चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला नसला तरी, अन्य राज्यांमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्‍चित करण्यावर समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सहमती झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संबंधित घटक पक्षांनी जिंकलेल्या जागा, राज्यातील सद्यस्थिती यांचा विचार करून जागावाटपाचा प्रश्‍न सोडवला जाईल. या चर्चामध्ये सर्वाधिक जागा जिंकणार्‍या पक्षाला जागावाटपामध्ये झुकते माप दिले जाईल. राज्या-राज्यांमध्ये समन्वय समिती स्थापन केली जाणार असून त्यामध्ये जागावाटपावर प्राथमिक चर्चा होईल व त्यानंतर केंद्रीय समन्वय समितीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ‘राज्यस्तरावर जागावाटपाचा प्रश्‍न लवकरात लवकर सोडवला जाईल’, असे समितीचे सदस्य व काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्येही स्थानिक नेत्यांकडून जागावाटपावर आक्षेप घेतला जात आहे. हरियाणामध्ये ‘आप’कडून लोकसभेच्या दहाही जागा लढवल्या जाणार असल्याच्या चर्चेनंतर हरियाणा काँग्रेसच्या नेत्यांनीही सर्व जागा लढवण्याचा दावा केला. मात्र, राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस व आम आदमी पक्षामध्ये तडजोड होण्याची शक्यता आहे. ‘आम्ही कुटुंबातील सदस्याप्रमाणे एकमेकांशी चर्चा करून जागावाटपाचा प्रश्‍न सोडवू’, असे ‘आप’चे नेते राघव चड्ढा यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. महाराष्ट्रामध्ये मंगळवारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्दयावर प्राथमिक चर्चा झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘इंडिया’च्या नेत्यांची पहिली संयुक्त सभा भोपाळमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात होणार आहे. या सभेत विविध मुद्दयांवर भर दिला जाणार असल्याची माहिती वेणुगोपाल यांनी दिली.  महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र होत असून मराठा- ओबीसी या नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘इंडिया’च्या घटक पक्षांनी राष्ट्रीय स्तरावर जातनिहाय जनगणनेची मागणी अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. समन्वय समितीच्या बैठकीत जातगणनेच्या मुद्दयावर सहमती झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीतच नव्हे तर, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही हा प्रचाराचा मुद्दा बनवला जाण्याचे संकेत ‘इंडिया’ने दिले.  

सनातन धर्माविषयी जाहीर करणार संयुक्त भूमिका – सनातन धर्माविरोधात ‘द्रमुक’च्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे ‘इंडिया’तील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या मुद्दयावरही समन्वय समितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे समजते. ‘द्रमुक’ने ‘सनातन’वर भूमिका स्पष्ट केली असून शिवसेना (ठाकरे गट) व अन्य पक्षांचे म्हणणेही विचारात घेण्यात आले. ‘सनातन’च्या वादावर घटक पक्षनेत्यांनी वेगवेगळी विधाने न करता ‘इंडिया’च्या प्रवक्त्यांकडून संयुक्तिक भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे समजते. दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्येही स्थानिक नेत्यांकडून जागावाटपावर आक्षेप घेतला जात आहे.

COMMENTS