Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीमाभागातील ऊस आंदोलन पेटले

कोल्हापूर ः दिवाळीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या

अंदाज समितीच्या आदेशाकडे दुर्लक्ष? बिलोलीतील अधिकार्‍यांच्या निलंबनास विलंब; नांदेड दौर्‍याच्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह
नांदेडच्या राजकारणात मोठी खळबळ; अजित पवार गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, राष्ट्रवादीला धक्का
’सोने खरेदी टाळा’च्या आवाहनाने सराफा बाजारात चिंतेचे ढग; हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात

कोल्हापूर ः दिवाळीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मंगळवारी 22 वी ऊस परिषद पार पडल्यानंतर बुधवारी आंदोलन सुरू झाले आहे. येत्या 3 दिवसात कारखानदारांनी निर्णय घ्यावा. अन्यथा दिवाळीनंतर आक्रमक आंदोलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. सीमाभागात ऊस आंदोलन चिघळलं आहे. सीमाभागातून महाराष्ट्रात येणारे ट्रॅक्टर पेटवले आहेत. कारदगा परिसरात शेतकर्‍यांनी आंदोलन केलं.

COMMENTS