Homeताज्या बातम्यादेश

’पीएफआय’संबंधित 17 ठिकाणांवर छापे

नवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतातील प्रतिबंधीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) 17 ठिकाणांवर  मंगळवारी छापे टाकण्यात आलेत. राष्ट्रीय तपास यंत्रण

एसआयआर 2026 मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा; प्रा. सय्यद शफीक हाश्मी यांचे आवाहनअचूक मतदार यादीसाठी बीएलओंना सहकार्य करा; बुंदेलपुरा येथील जनजागृती कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन
आरोपींच्या घरावर जेसीबी चालवणारगुन्हेगारांना मुभा नाही; शिर्डी खून प्रकरणात माजी खा. विखेंचा इशारा
पवना धरण भरले; मुळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

नवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतातील प्रतिबंधीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) 17 ठिकाणांवर  मंगळवारी छापे टाकण्यात आलेत. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी संयुक्तपणे बिहार, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश इत्यादी ठिकाणी ही कारवाई केली.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीएफआयचे अनेक ओव्हर ग्राउंड वर्कर्स (ओजीडब्ल्यू) पुन्हा एकदा देशविरोधी कारवायांमध्ये सक्रीय झाले आहेत. पीएफआयवर बंदी घातल्यानंतर आणि त्याचे प्रमुख नेते तुरुंगात गेल्यानंतर संघटनेने आपल्या कार्यकर्त्यांचे पुनर्गठन आणि मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. केंद्र सरकारने 2022 मध्ये पीएफआयवर बंदी घातली होती. केंद्राने या संघटनेवर 5 वर्षांची बंदी घातली आहे. वास्तविक, अनेक राज्यांनी पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली होती. पीएफआय व्यतिरिक्त, केंद्राने रिहॅब इंडिया फाउंडेशन (आरआयएफ), कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय), ऑल इंडिया इमाम कौन्सिल (एआयआयसी), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशन (एनसीएचआरओ), नॅशनल वुमन फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पॉवर इंडिया यांच्यावरही बंदी घातली आहे. फाउंडेशन आणि रिहॅब इंडिया फाऊंडेशन या फाउंडेशनवरही बंदी घालण्यात आली होती. याआधीही एनआयए आणि सर्व राज्यांच्या पोलीस आणि एजन्सींनी पीएफआय तळांवर छापे टाकले आणि शेकडो लोकांना अटक केली. तपास यंत्रणांना पीएफआयविरोधात पुरेसे पुरावे मिळाले होते. यानंतर तपास यंत्रणांनी गृह मंत्रालयाकडे कारवाईची मागणी केली होती. तपास यंत्रणांच्या शिफारशीवरून गृह मंत्रालयाने पीएफआयवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. पीएफआय सध्या दिल्ली, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, केरळ, झारखंड, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश इत्यादी 15 राज्यांमध्ये सक्रीय आहे.

COMMENTS