Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजितदादा आणि आमच्यात मनभेद नाही

सुप्रिया सुळेंनी संजय राऊतांचाच घेतला समाचार

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसकडून अद्यापही अजित पवार गटावर घणाघाती टीका करण्याऐवजी त्यांची

सुप्रिया सुळेंकडून सिंदखेड राजात आढावा… विकासकामांसाठी भेटणार केंद्रीय पर्यटनमंत्र्यांना
राज्यात दुष्काळ जाहीर करा ः सुप्रिया सुळे
काँगे्रसमध्ये विलीन होण्याचा प्रश्‍नच नाही ः सुप्रिया सुळे

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसकडून अद्यापही अजित पवार गटावर घणाघाती टीका करण्याऐवजी त्यांची अप्रत्यक्षपणे पाठराखणच करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या आहेत. त्यामधील अनेक संस्थांवर अजित पवार आहेत. यामुळे या संस्थांचे पुढे काय करायचे त्यावर चर्चेसाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या संस्थांमधून अजित पवार यांनी बाहेर पडावे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेत अजित पवार यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार आणि आमचे राजकीय मतभेद आहे. परंतु आमच्यात मनभेद नाही. अजितदादांवर केलेल्या अशा टीकेबद्दल मला हसू येते. हे सर्व बाळबोध आहे. या सर्व संस्थांच्या काय करायचे ते आम्ही ठरवू. आम्ही नाती नेहमी जपली आहेत. घरातील नातीतर सोडा आज देशात अनेक ठिकाणी आमची नाती तयार झाली आहेत. माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झाले आहे, पवार कुटुंबियांचे संस्कार आहे. यामुळे आम्ही सर्वांशी प्रेमाने बोलणार आहे, संजय राऊत यांचे वक्तव्य हे बाळबोध असल्याचे सांगत सुप्रिया सुळेंनी त्यांना चांगलेच फटकारले आहे.  

सरकारची भूमिका सरकारविरोधी – केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. त्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. यावरही सुप्रिया सुळे यांनी टीका केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, तीन महिन्यांपूर्वी मी पीयूष गोयल यांना ट्विट केले होते. त्या वेळी त्यांना कांदा निर्यातीला परवानगी द्या, अशी मागणी केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. आज कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. केंद्र सरकारची भूमिका नेहमी शेतकर्‍यांच्या विरोधात राहिली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

COMMENTS