Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये राहुल गांधींचा ताफा अडवला

हिंसाचार पीडितांना भेटण्यापासून रोखले

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूर राज्यामध्ये गेल्या 50 दिवसांपेक्षाही अधिक दिवसांपासून हिंसाचार सुरू असून, 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हा हिं

चीनने लडाखची जमीन बळकावली
राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, कोर्टाकडून याचिका फेटाळली
काँग्रेसच्या वतीने कल्याणमध्ये भाजपाच्या विरोधात बॅनरबाजी

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूर राज्यामध्ये गेल्या 50 दिवसांपेक्षाही अधिक दिवसांपासून हिंसाचार सुरू असून, 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हा हिंसाचार रोखण्यात राज्य आणि केंद सरकार दोघांनाही अपयश आल्याचे दिसून येत असून, या हिंसाचार पीडितांची भेट घेण्यासाठी काँगे्रस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या मणिपूर दौर्‍यावर आहेत. मात्र गुरुवारी राहुल गांधी मणिपूरमध्ये पोहोचल्यानंतर ते थेट पीडितांची भेट घेण्यासाठी जात असतांना, पोलिसांनी रस्त्यातच त्यांचा ताफा अडवला आहे. पोलिसांनी परिसर हिंसाचारामुळे धगधगता असल्याचे कारण दिले आहे. राहुल गांधी यांचा ताफा बिष्णूपूर जिल्ह्यात रोखण्यात आला आहे. राहुल गांधी इंफाळपासून फक्त 20 किमी पुढे जाऊ शकले आहेत.
राहुल गांधी दोन दिवसांच्या मणिपूर दौर्‍यावर आहेत. गुरुवारी सकाळी दिल्लीहून विमानाने ते मणिपूरसाठी रवाना झाले. राहुल गांधी 29 आणि 30 जून असे दोन दिवस मणिपूरमध्ये असणार आहेत. यावेळी ते मदत शिबिरांचा दौरा करणार असून, पीडितांशी चर्चा करत त्यांची स्थिती जाणून घेणार आहेत. याशिवाय राहुल गांधी राजधानी इंफाळ आणि चुराचांदपूर येथील सिव्हिल सोसायटीच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. राहुल गांधी दुपारी तुइबोंगच्या ग्रीनवूड अकॅडमी आणि चुराचांदपूर येथील सरकारी कॉलेजमध्ये जाणार आहेत. यानंतर ते कोन्जेंगबामधील सार्वजनिक हॉल आणि मोइरांग कॉलेजात जाणार आहेत. मात्र राहुल गांधींच्या या भेटीला पोलिसांनी नकार देत त्यांचा ताफा अडवला आहे. मणिपूरमध्ये गेल्या 52 दिवसांपासून हिंसाचार सुरु असून जाळपोळ केली जात आहे. येथे आतापर्यंत 120 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसंच मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरचा दौरा केला होता. तसेच मदत शिबीरांमध्ये जाऊन पीडितांचे म्हणणे ऐकून घेतले होते. तसेच एका आठवड्यापूर्वी त्यांनी दिल्लीत मणिपूरसंबंधी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. 18 पक्षांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाने मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही केली होती. मणिपूरमधील जातीय संघर्षानंतर आतापर्यंत जवळपास 50 हजाराहून अधिक लोक 300 पेक्षा जास्त मदत शिबीरांमध्ये वास्तव्यास आहेत. दरम्यान दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी अमित शाह यांची भेट घेत त्यांना परिस्थितीची माहिती दिली होती.

COMMENTS