Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात 30 जून पर्यंत मनाई आदेश लागू

बीड प्रतिनिधी - बीड जिल्हयात दि.17 जून 2023 रोजी राजमाता जिजाऊ पुण्यतिथी,  दि.26 जून 2023 रोजी शाहू महाराज जंयती आणि दि. 29 जून 2023 रोजी बकरी ईद

वनवासी बांधवांचे संस्कृती रक्षणाचे कार्य समाजापुढे आणावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
देशभरात नव वर्षाच्या स्वागताचा उत्साह
करंजी गावची यात्रा सर्व धर्मीयांचे प्रतीक ः बिपीनदादा कोल्हे

बीड प्रतिनिधी – बीड जिल्हयात दि.17 जून 2023 रोजी राजमाता जिजाऊ पुण्यतिथी,  दि.26 जून 2023 रोजी शाहू महाराज जंयती आणि दि. 29 जून 2023 रोजी बकरी ईद (चंद्रदर्शनानुसार एक दिवस मागे किंवा पुढे) व आषाढी एकादशी असे सण असून जिल्ह्यात राजकिय हालचाली, घडामोडी, मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे व रास्ता रोको यासारखे आंदोलने होण्याची शक्यता आहे.
तसेच केजचे तहसीलदार यांनी केज शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी दि. 16 जून 2023 रोजी सर्व शासकीय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोहिम राबविली जाणार असून मोहिम राबवत असतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रशन निर्माण होण्याची शक्यता नाकराता येत नाही यरकरिता केज शहरात दि. 16 जून 2023 पासून म.पो.अ. 1951 चे कलम 37 (1)( (3)  अन्वये जमावबंदी आदेशही लागू करण्याची विनंती केली आहे. या कारणांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दि. 16 जून 2023 रोजी रात्री 12 वाजेपासून ते 30 जून 2023 रोजीच्या रात्री 24.00 वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी संतोष राऊत बीड यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या कालावधीत काढण्यात येणा-या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येण्यास निर्बंध आहे. शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यां व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या जवळपास खालील बाबीस मनाई करण्यात आली आहे. शस्त्र, सोटे ,काठी, तलवार, बंदूक, लाठया, काठया, कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके, दगड, किंवा इतर क्षेपाणस्त्रे, शरीरास इजा होणा-या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडांबनात्मक नकल, सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षिता धोक्यात येईल, किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणतीही वस्तू जवळ बाळगू नये. जाहिरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचणार असेल यासाठी मनाई आहे.  किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचणारी असेल, व्यक्तीच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती, किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन यासाठी मनाई आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही, मिरवणूका मोर्चे काढता येणार नाही.   कोणताही मोर्चा, सभा, मिरवणूक व तत्सम कोणतीही कृती करण्यासाठी त्या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिका-यांची पूर्वमान्यता घेणे आवश्यक राहील. तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस लागु राहणार नाहीत व अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजूरीशिवाय 15 दिवसापेक्षा जास्त तुदतीपर्यंत अमलात राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS