Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाकरवण येथील नारायण उंडे ची गळफास घेऊन आत्महत्या

खिशात सापडलेल्या चिठ्ठीने उडाली खळबळ चिठ्ठीतील संबंधित व्यक्तीवर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

माजलगांव प्रतिनिधी - तालुक्यातील टाकरवन येथील नारायण भगवान उंडे वय वर्षे 40 यांनी दि. 12 मे 2023 शुक्रवार रोजी शेतातील आंब्याच्या झाडाला दुपारच्य

फायनान्स कंपनीच्या गुंडागर्दीला कंटाळून कोंढव्यातील रिक्षाचालकाची आत्महत्या
स्वतःच्याच गॅरेजमध्ये गळफास घेऊन गॅरेज चालकाची आत्महत्या
कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या

माजलगांव प्रतिनिधी – तालुक्यातील टाकरवन येथील नारायण भगवान उंडे वय वर्षे 40 यांनी दि. 12 मे 2023 शुक्रवार रोजी शेतातील आंब्याच्या झाडाला दुपारच्या वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी खिशात सापडल्याने एकच खळबळ माजली असून चिठ्ठीतील संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण उंडे यांच्या पत्नी शिवकन्या उंडे यांनी माजलगाव ग्रामीण पोलीसात फिर्याद दाखल केली आहे की, माझे पती व मी सोनारपाडा डोंबिवली ईस्ट ठाणे येथे राहत होतोत. माझे पती नारायण उंडे हे चूर टेक्स्टाईल सरवली एमआयडीसी गोवेगाव भिवंडी जि. ठाणे या कंपनीत लँब मध्ये काम करत होते. त्याच लॅब मध्ये दत्ता बाबासाहेब पाथरकर रा. टाकरवन हा चुर कंपनीमध्ये लॅब इनचार्ज म्हणून कामाला आहे. नारायण हे त्याच्या हाताखाली होते. दत्ता पाथरकर यानी तुला जर कंपनीमध्ये माझ्या हाताखाली काम करायचे असेल तर मला पैसे द्यावे लागतील,तसेच याच कंपनीमध्ये पाथरकर याचे एका महिलेशी प्रेम संबंध आहेत. त्या महिलेस तू गाडीवर ने आन करत जा असे म्हणत होता. व सतत पैशाची मागणी करत मानसिक त्रास देत होता. पाथरकर कडून होत असलेला त्रास नारायण घरी आपल्या पत्नीला व आई-वडिलांना सांगत असे. पाथरकर यांनी केलेल्या पैशाची मागणी पूर्ण न केल्याने नारायण ला एक महिन्यापूर्वी दत्ता पाथरकर यानी कंपनी मधून नोकरीवरून काढून टाकले होते. नोकरी गेल्यामुळे नंतर नारायणने दुसरीकडे काम पाहिले पण तिथे ही दत्ता पाथरकर यानी काम करून दिले नाही. असे नारायण यानी आत्महत्या करण्यापुर्वी खिशात लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत व घरी सुद्धा डायरी मध्ये लिहून ठेवलेले आहे. मी माझे जीवन संपत आहे. असा मजकूर डायरीत लिहून ठेऊन व सही करून आत्महत्या केलेली आहे.  नारायण व त्यांचे कुटुंबीय नुकतेच कार्यक्रमानिमीत्त आपल्या टाकरवण या गावाकडे आले होते. नारायण हा गावातील शांत स्वभावाचा मुलगा होता. तो आई-वडिलांना एकुलता एक होता. नारायण च्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नारायण उंडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा वय10, व मुलगी वय 13 असा परिवार आहे. या प्रकरणी दत्ता पाथरकर यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 306 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास माजलगाव ग्रामीणचे पोलीस अधिकारी रणजीत कासले हे करत आहेत.

COMMENTS