Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

कामठा (बु.) येथील शेतकर्‍यांचा खून

अर्धापूर : तालुक्यातील कामठा बु. येथील शेतकरी घराच्या समोर झोपला असतांना डोक्यात गंभीर मार लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. हि घटना दि.18 मंगळवारी रो

भोकर बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप; खड्डे, चिखल अन् पाण्यामुळे प्रवाशांचे हालप्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका हजारो प्रवाशांना; तातडीने उपाययोजनांची मागणी
मेंडकीच्या जिल्हा परिषद शाळेला तलावाचे स्वरूपसाचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; पेव्हर ब्लॉक टाकण्याची ग्रामस्थांची मागणी
अध्यात्मिक वारसा जतनासाठी ’श्री राहेरक्षेत्र महात्म्य’ पुस्तकाला आर्थिक बळ; कॅप्टन आशिष दामले यांच्याकडून ५० हजारांची मदत


अर्धापूर : तालुक्यातील कामठा बु. येथील शेतकरी घराच्या समोर झोपला असतांना डोक्यात गंभीर मार लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. हि घटना दि.18 मंगळवारी रोजी मध्यरात्री 2-30 ते 5 च्या दरम्यान घडली असल्याचा संशय आहे.
कामठा येथील शेतकरी प्रल्हाद राजाराम कल्याणकर (वय 56) यांच्या कानाच्या वर डोक्याला जबर वार करून गंभीर जखमी झालेल्या शेतकरी जागीच ठार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षका अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्‍वर व्यंजन यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक चंद्रकांत कदम यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जमादार ताटे, पप्पू चव्हाण, रणवीरकर, आर.एस. नरवाडे,संभाजी शिवभक्त, सुभाष मुंगळ, बाबाराव चाटे, संतोष काळे,इंदुताई गवळी या खुन प्रकरणी सखोल चौकशी करीत आहेत.या खुन प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

COMMENTS