Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.संजय गायकवाडांवर खा.छत्रपती शाहू महाराजांचा संताप

कोल्हापूर : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून पेटलेल्या वादाला आता ठळक राजकीय वळण मिळाले असून, आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून विविध स्तर

आ.संजय गायकवाडांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नाही; शिवसेनेने हात झटकले, विधानाचा केला निषेध
पुस्तक, इतिहास आणि धमकी !
गायकवाडचे बोल म्हणजे सत्तेतून आलेला माज !
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या आमदाराची आमदारकी जाणार?; 'हे' विधान  भोवणार? - Dainik Prabhat

कोल्हापूर : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून पेटलेल्या वादाला आता ठळक राजकीय वळण मिळाले असून, आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित वक्तव्याची शुक्रवारी कठोर शब्दांत निंदा केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना शाहू महाराज छत्रपती यांनी सार्वजनिक पदांवर असलेल्या व्यक्तींनी बोलताना संयम आणि जबाबदारीचे भान ठेवणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही विषयावर अविचारी किंवा आक्षेपार्ह भाषा वापरणे समाजासाठी घातक ठरते, असे सांगत त्यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याला अयोग्य ठरवले. या प्रकरणात सरकारने विलंब न लावता ठोस कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आमदारकी रद्द करण्याबाबतच्या तांत्रिक बाबी वेगळ्या असल्या तरी अशा वर्तनावर कठोर पावले उचलली गेली पाहिजेत, असे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी शासनाच्या भूमिकेवरही सूचक टीका केली. काही संवेदनशील प्रकरणांमध्ये निर्णय घेण्यास होणारा विलंब प्रश्‍नचिन्ह निर्माण करतो, असे नमूद करत त्यांनी या वादात सरकारने तत्परतेने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. अखेरीस या सर्व प्रकारावर अंतिम निर्णय जनता देईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. या वादाच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नसून कायदेशीर सल्ल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणावरून चर्चेला अधिक उधाण आले आहे. एकूणच, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सार्वजनिक वर्तनाची मर्यादा आणि कायद्याची अंमलबजावणी याबाबत पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

अद्याप गुन्हा का दाखल नाही : आ. रोहित पवार

एक सोची-समझी साजिश': रोहित पवार ने अजीत पवार की मृत्यु के कुछ हफ्तों बाद  एनसीपी की सत्ता हथियाने के लिए आंतरिक साजिश का आरोप लगाया | मुंबई ...

या प्रकरणात कारवाईचा अभाव असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. पुरावे सादर करूनही अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने सरकारशी संबंधित व्यक्तींवर कारवाई टाळली जाते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गृहखात्याची भूमिका निष्पक्ष आहे का, यावरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. वादाची ठिणगी ठरलेल्या घटनेत, आमदार गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशकाला धमकी दिल्याचा आरोप आहे.

COMMENTS