Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यातील वकिल दाम्पत्यांचे अपहरण करून खून

दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोन आरोपी पसार

देवळाली प्रवरा ः राहुरी न्यायालयामध्ये वकील व्यवसायाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदत करणार्‍या आढाव दाम्पत्यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. दो

पालघरमध्ये लिव्ह-इन-पार्टनरची हत्या
सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ
राजस्थानमधील जोधपूर मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या

देवळाली प्रवरा ः राहुरी न्यायालयामध्ये वकील व्यवसायाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदत करणार्‍या आढाव दाम्पत्यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या दोघा पती – पत्नीचा मृतदेह उंबरे (ता. राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहीरीत आढळला अ‍ॅड. राजाराम जयवंत आढाव (52) व अ‍ॅड. मनिषा आढाव असे या दाम्पत्याचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. दोघांनाही दगड बांधून विहीरीत टाकून दिल्याचे निदर्शनास आले आहे.पक्षकार व वकिल यांच्यात अवघ्या 20 हजार रुपयांच्या फि वरुन वाद निर्माण झाल्याने पक्षकाराने वकील पती पत्नीचा खूण केला असल्याचे बोलले जात असले तरी ताब्यात घेतलेले चौंघा पैकी दोन जण सराईत गुन्हेगार असल्याने या खुनाचा खरा मास्टरमाईंड कोण याचा शोध घेणे पोलीसांसमोर आवाहन आहे.

          अ‍ॅड. राजाराम जयवंत आढाव, वय 52 वर्षे, तसेच अ‍ॅड. मनीषा राजाराम आढाव, वय 42 वर्षे, हे वकिल दाम्पत्य राहुरी तालूक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहत असून ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. अ‍ॅड. राजाराम आढाव हे काल दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी दुपार पर्यंत राहुरी येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करत होते. त्यानंतर दुपारी दोन वाजे दरम्यान ते अहमदनगर येथे गेले. त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांच्या पत्नी अ‍ॅड. मनीषा आढाव यांना बोलावून घेतले. अशी माहिती मिळाली आहे. तेव्हापासून आढाव हे दोघे पती पत्नी बेपत्ता आहेत. 26 जानेवारी 2024 रोजी पहाटे दोन वाजे अ‍ॅड. राजाराम आढाव यांची फियस्टा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एमएच 17 ए इ 2390 ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळून आली. पहाटे पोलिस पथक गाडी जवळ पोहचले तेव्हा त्यावेळी अ‍ॅड. आढाव यांच्या गाडी जवळ दुसरी एक डस्टर गाडी उभा होती. मात्र पोलिस गाडी आल्याचे पाहताच सदर डस्टर गाडी त्या ठिकाणाहून सुसाट वेगात निघून गेली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने अ‍ॅड. आढाव यांची चारचाकी गाडी ताब्यात घेतली. त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत एक हातमोजा, दोर व एक बूट आढळून आला. तपासा दरम्यान पोलिस पथकाला आज दुपारी 12 वाजे दरम्यान आढाव यांची दुचाकी क्र. एम एच 17 ए डब्लू  3207 ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरात बेवारस मिळून आली. तसेच आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँके समोर बेवारस मिळून आले. घटनेनंतर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक व राहुरी पोलीस पथक आढाव दाम्पत्यांचा शोध घेत होते. या दरम्यान जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, हवालदार मनोज गोसावी, गणेश भिंगारदिवे, रणजीत जाधव, सचिन आडबल, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, सागर ससाने, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर, संभाजी कोतकर आदि पोलिस पथकाने सदर डस्टर गाडीचा शोध घेऊन उंबरे येथील किरण नामक व आणखी एक अशा दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी घटनेची माहिती दिली. संशईत म्हणून पकडलेले दोघे सराईत गुन्हेगार असल्याने खुनाचा मास्टर माईंड कोण याचा शोध घेणे पोलीसां समोर आवाहन आहे. आरोपींनी दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी दुपारी आढाव दाम्पत्याचे अपहरण करून त्यांना त्यांच्या मानोरी येथील घरी घेऊन गेले. तेथे दोघांचा खूण करून रात्रीच्या दरम्यान त्यांचे मृतदेह दगड बांधून उंबरे येथील स्मशानभूमीत असलेल्या विहिरीत टाकून दिले. शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी रात्री दहा वाजे दरम्यान पोलिस प्रशासनाने आढाव दाम्पत्याचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ताब्यात घेतले. पुढील तपास सुरु आहे. मात्र या घटनेने अहमदनगर जिल्हा हादरुन गेला.

खूनाचे कारण संपत्ती असल्याचा संशय – काही वर्षापूर्वी अँड दिनकर ताके यांचा नेवासा तालुक्यात जमिनीच्या वादातून खून झाला होता. अँड मनिषा आढाव या आँड ताके यांची पुतणी असल्याचे समजते. अँड मनिषा आढाव यांच्या नावावर मोठी इस्टेट असल्याचे समजते. याच इस्टेटी वरुन सुपारी देवून हा खून झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. पोलिसांनी पकडलेल्या दोन संशईत गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार आहेत. तसेच या दोघांची कोणतीही केस अँड आढाव दांपत्य यांच्याकडे नसल्याचे पुढे येत आहे. खुनाचे खरे कारण काय असु शकते या बाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत.

COMMENTS