Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

महाराष्ट्रात 1.14 लाख कोटींची गुंतवणूक8,000 जणांना मिळणार रोजगार ; उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब यांच्यात करार

मुंबई : राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि ‘

मोबाइल फोन पाण्यात भिजल्यास काय कराल ?
मसुचीवाडी हायस्कूलचे सहा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र : दोन लाख तीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार
योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवले एलईडी स्क्रीन


मुंबई : राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि ‘एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड’ समवेत 1 लाख 14 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार गुरूवारी झाला.
मुख्यमंत्री समिती कक्षात झालेल्या या कराराच्या वेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अन्बळगण, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, सहसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, एएम इंटेलिजन्स लॅब्जचे अध्यक्ष अनिल चलमलाशेट्टी, संचालक मौर्य पायदा, उपाध्यक्ष पंकज कुमार आदी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे राज्यात तब्बल 8 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. या सामंजस्य करारामुळे मुंबई महानगर प्रदेशात ‘इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क’ आणि ‘एआय कॉम्प्युट हब’ उभारला जाणार आहे. यासाठी कंपनी 1,14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर आधारित असेल, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षणही होईल.उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8 हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट आणि ऑपरेशन्स टीमचा समावेश असेल. प्रकल्पाच्या बांधकाम कालावधीत सुमारे 2 हजार अतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा प्रकल्प 500 मेगावॅट क्षमतेचा असून यामध्ये 2,50,000 उच्च क्षमतेचे ‘एआय चिपसेट्स’ वापरले जातील. तसेच या प्रकल्पाचा दोन टप्प्यांत विकास करण्यात येईल. 200 मेगावॅट क्षमतेचा पहिला टप्पा सन 2028 पर्यंत तर 300 मेगावॅट क्षमतेचा दुसरा टप्पा 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

COMMENTS