पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांन

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “मी राजीनामा देणार नाही आणि आम्ही निवडणूक हरलोच नाही,” असं म्हणत त्यांनी सर्वांनाच चकित केलं आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. निकालाच्या सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपने आपली पकड मजबूत केली होती. पंतप्रधान मोदींनी या विजयाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदनही केले आहे. मात्र, या सर्व घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतलेली भूमिका आता भाजपची डोकेदुखी ठरू शकते.
पराभवानंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ममता दीदींनी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, “माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” त्यांच्या या विधानामुळे बंगालच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. निवडणुकीत मोठा पराभव समोर दिसत असूनही ममता बॅनर्जी यांनी विजयाचा दावा सोडलेला नाही.
एकीकडे भाजप नेते आणि कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत आहेत, तर दुसरीकडे ममता बॅनर्जींच्या या भूमिकेमुळे पेच निर्माण झाला आहे. आता पश्चिम बंगालचे राजकारण कोणत्या वळणावर जाते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यामुळे सत्तास्थापनेचा पेच अधिक वाढणार का? की भाजप आपला विजय अधिकृतपणे प्रस्थापित करणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

COMMENTS