Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची करणार होळी ः जितेंद्र आव्हाड

मुंबई ः मनुस्मृति पुन्हा एकदा लागू करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी ते मागच्या दाराचा वापर करत असल्याचा आरोप

मालवाहतूक वाहनाने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी.
प्रादेशिक पक्ष काँगे्रसमध्ये विलीन होतील
सातारा जिल्ह्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांचे भविष्य काय?

मुंबई ः मनुस्मृति पुन्हा एकदा लागू करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी ते मागच्या दाराचा वापर करत असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या संदर्भात विरोध करण्यासाठी 29 मे रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन देखील आव्हाड यांनी केले आहे. शालेय अभ्यासक्रमात भगवत गीता, मनाचे श्‍लोक यांचा समावेश करण्यात येणार आहे. मागच्या दाराने हा देशात मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

COMMENTS