Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची करणार होळी ः जितेंद्र आव्हाड

मुंबई ः मनुस्मृति पुन्हा एकदा लागू करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी ते मागच्या दाराचा वापर करत असल्याचा आरोप

‘ये मावशी थांब तुझ्या पाया पडू का? रावसाहेब दानवे
राहता तहसीलच्या ‘संजय गांधी’ विभागात सावळागोंधळ?नागरिकांची तक्रार ; कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी  
बळी राजाला सुखावणारा कोणताही निर्णय हे सरकार घेत नाही आहे- आ. अमोल मिटकरी 

मुंबई ः मनुस्मृति पुन्हा एकदा लागू करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी ते मागच्या दाराचा वापर करत असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या संदर्भात विरोध करण्यासाठी 29 मे रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन देखील आव्हाड यांनी केले आहे. शालेय अभ्यासक्रमात भगवत गीता, मनाचे श्‍लोक यांचा समावेश करण्यात येणार आहे. मागच्या दाराने हा देशात मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

COMMENTS