Homeताज्या बातम्या

‘मोफत’ योजनांवरून पंजाब सरकारला उच्च न्यायालयाचा झटका; कर्मचाऱ्यांच्या थकबाकीवरून ओढले ताशेरे

चंदीगड : पंजाब सरकारच्या आर्थिक धोरणांवर आणि कारभारावर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. एका बाजूला तिजोरीत खडख

खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी; नाशिक मनपात शिंदे अन् ठाकरे गट आमनेसामने, जोरदार हायव्होल्टेज ड्रामा!
मुक्त पत्रकारितेच्या शिरपेचात मानाचा सातवा तुरा
शारदा कन्या विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात; शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनींचा सत्कार
High Court Raps Punjab Government Over Free Schemes, Raises Questions Over  Pending Employee Dues

चंदीगड : पंजाब सरकारच्या आर्थिक धोरणांवर आणि कारभारावर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. एका बाजूला तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे थकवायचे आणि दुसऱ्या बाजूला मोफत योजना आणि जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करायची, या सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

पंजाब सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी थकीत महागाई भत्ता आणि रोखलेल्या थकबाकीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान पंजाब सरकारने न्यायालयात असे प्रतिपादन केले होते की, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असून तिजोरीत पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे ही थकबाकी देणे सध्या शक्य नाही. यावर न्यायालयाने सरकारचा हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि सरकारच्या प्राधान्यक्रमांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

न्यायालय म्हणाले की, “सरकार एका बाजूला कर्मचाऱ्यांचे कायदेशीर देणे देण्यासाठी ‘पैशांची कमतरता’ असल्याचे सांगते. तसेच दुसऱ्या बाजूला विविध मोफत योजना आणि स्वतःच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. हा स्पष्टपणे दुटप्पीपणा आहे. महागाई भत्ता हे कर्मचाऱ्यांचे हक्काचे देणे आहे. तो रोखणे म्हणजे महागाईचा थेट फटका कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या स्वयंपाकघराला देण्यासारखे आहे. केवळ कागदावर बजेटचा ताळमेळ बसवण्यासाठी किंवा राजकीय फायद्याच्या योजना चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या उपजीविकेवर गदा आणता येणार नाही. राज्याची आर्थिक जबाबदारी पार पाडणे हे ‘कल्याणकारी राज्याचे’ प्राथमिक कर्तव्य आहे.”

COMMENTS