Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला

मुंबई ः मुंबईमध्ये पाणीपुरवठा करणार्‍या 6 धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विहार धरण 100 टक्के भरले आहे. तसेच अन्य 4 धरणे 95 टक्क्यांहून जास्त

सीएनजी अडीच रुपयांनी महागला
बारा कलमी कार्यक्रमावर जिल्हाधिकार्‍यांचे ऐतिहासिक निर्देश; दिव्यांग प्रश्नांवर तातडीने कारवाईचे आदेश
माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन

मुंबई ः मुंबईमध्ये पाणीपुरवठा करणार्‍या 6 धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विहार धरण 100 टक्के भरले आहे. तसेच अन्य 4 धरणे 95 टक्क्यांहून जास्त भरली आहेत. जुलैमहिन्यात मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. धो धो बरसलेल्या पावसाने मुंबईतील धरणांची पाणीपातळी काही प्रमाणात वाढली. अप्पर वैतरणा धरण 71.92 टक्क्यांनी भरले आहे. मोडकसागर 94.20 टक्के, तानसा 98.12 टक्के, मध्य वैतरणा 96.26 टक्के, भातसा 78.47 टक्के, विहार 100 टक्के, तुळशी 98.12 टक्क्यांनी भरले आहे.

COMMENTS