Homeताज्या बातम्या

धो धो पाऊस अन् नदीपात्रात पेटती चिता

हि धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली

औरंगाबाद प्रतिनिधी - राज्यात अनेक ठिकाणी स्मशान भूमी नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागते. औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असताना कन्नड तालुक

प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा ; २०८८ सहायक प्राध्यापक पदे भरण्यास मान्यता
अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा
विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन

औरंगाबाद प्रतिनिधी – राज्यात अनेक ठिकाणी स्मशान भूमी नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागते. औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असताना कन्नड तालुक्यातील अमदाबाद येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला. अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने अडचण निर्माण झाली. नदीच्या पात्रात चिता रचून पेटवली. त्यानंतर लगेच पावसाचे आगमन झाले. यानंतर नदी दुथडी भरून वाहू लागले. जळती चिता वाहून गेली तर काय होईल, अशी चिंता नातेवाईकांना होऊ लागली होती. मात्र, सुदैवाने तशी दुर्घटना घडली नाही. स्मशानभूमीची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

COMMENTS