नवी दिल्ली: नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणावरून कॉक्रोच जनता पक्षाने (सीजीपी) आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षा

नवी दिल्ली: नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणावरून कॉक्रोच जनता पक्षाने (सीजीपी) आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने आज शुक्रवारी (२४ जुलै) देशभरात शांततापूर्ण निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या महिनाभरापासून नवी दिल्लीत या मुद्द्यावर सातत्याने आंदोलन सुरू असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी पक्षाकडून करण्यात येत आहे.
कॉक्रोच जनता पक्षाने आता देशभरातील कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांना शांततेच्या मार्गाने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीच्या मार्गाने आपला आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे पक्षाने म्हटले आहे.

COMMENTS